शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

विद्यार्थ्यांनी केले लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

चिपळूण : महापुराच्या काळात चिपळूणवासीयांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले हाेते. पुराची स्थिती निवळल्यानंतर या बाटल्यांचा खच ...

चिपळूण : महापुराच्या काळात चिपळूणवासीयांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले हाेते. पुराची स्थिती निवळल्यानंतर या बाटल्यांचा खच अनेक ठिकाणी दिसू लागल्याने प्लास्टिक बाटल्यांची समस्या निर्माण झाली हाेती. अखेर शहरातील नवकाेंकण एज्युकेशन साेसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘प्लास्टिक बाटलीमुक्त शहर अभियान’ राबवले. या अभियानात लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

२२ जुलै रोजी चिपळूण शहरवासीयांनी भयंकर महापुराचा सामना केला. या महापुरामुळे संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या संपूर्ण शहरात वाटण्यात आल्या. महापुराची परिस्थिती ओसरल्यानंतर या बाटल्या रस्त्यावर आल्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. या प्लास्टिक बाटल्यांमुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. हे सर्व टाळण्यासाठी या बाटल्या जमा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे आवश्यक होते. याच उद्देशाने डीबीजे महाविद्यालयाने या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमादरम्यान दिनांक १९ ऑगस्ट रोजी चिपळूण शहरातील शंकरवाडी व मुरादपूर परिसरात डीबीजेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बाटल्यांचे संकलन केले. शहरातील गोवळकोट रोड व पेठमाप या परिसरातील प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. तसेच मुख्य बाजारपेठ, बहादूर शेख नाका ते चिंचनाका व खेंड परिसरात प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. डीबीजेच्या या अभियानात दररोज साधारणपणे ४० ते ४५ विद्यार्थी सहभागी होत होते. दररोज साधारणपणे १३ ते १४ हजार प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करून सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेकडे या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आल्या.

हा उपक्रम राबवण्यासाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. नामदेव तळप, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार पेढामकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. नियामक समिती सदस्य लियाकत दलवाई यांनी या उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या प्लास्टिक बॅगा पुरविल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, प्रा. उदय बामणे, प्रा. डॉ. उत्तम सूर्यवंशी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. स्वप्नील साडविलकर यांनी विशेष प्रयत्न केले. या अभियानात सौरभ घोरपडे, प्रतीक जठार, अंकित शर्मा, माहीन मुल्ला, भूषणा पाटणकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.