शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

विद्यार्थ्यांनी केले लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

चिपळूण : महापुराच्या काळात चिपळूणवासीयांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले हाेते. पुराची स्थिती निवळल्यानंतर या बाटल्यांचा खच ...

चिपळूण : महापुराच्या काळात चिपळूणवासीयांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले हाेते. पुराची स्थिती निवळल्यानंतर या बाटल्यांचा खच अनेक ठिकाणी दिसू लागल्याने प्लास्टिक बाटल्यांची समस्या निर्माण झाली हाेती. अखेर शहरातील नवकाेंकण एज्युकेशन साेसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘प्लास्टिक बाटलीमुक्त शहर अभियान’ राबवले. या अभियानात लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

२२ जुलै रोजी चिपळूण शहरवासीयांनी भयंकर महापुराचा सामना केला. या महापुरामुळे संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या संपूर्ण शहरात वाटण्यात आल्या. महापुराची परिस्थिती ओसरल्यानंतर या बाटल्या रस्त्यावर आल्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. या प्लास्टिक बाटल्यांमुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. हे सर्व टाळण्यासाठी या बाटल्या जमा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे आवश्यक होते. याच उद्देशाने डीबीजे महाविद्यालयाने या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमादरम्यान दिनांक १९ ऑगस्ट रोजी चिपळूण शहरातील शंकरवाडी व मुरादपूर परिसरात डीबीजेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बाटल्यांचे संकलन केले. शहरातील गोवळकोट रोड व पेठमाप या परिसरातील प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. तसेच मुख्य बाजारपेठ, बहादूर शेख नाका ते चिंचनाका व खेंड परिसरात प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. डीबीजेच्या या अभियानात दररोज साधारणपणे ४० ते ४५ विद्यार्थी सहभागी होत होते. दररोज साधारणपणे १३ ते १४ हजार प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करून सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेकडे या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आल्या.

हा उपक्रम राबवण्यासाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. नामदेव तळप, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार पेढामकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. नियामक समिती सदस्य लियाकत दलवाई यांनी या उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या प्लास्टिक बॅगा पुरविल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, प्रा. उदय बामणे, प्रा. डॉ. उत्तम सूर्यवंशी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. स्वप्नील साडविलकर यांनी विशेष प्रयत्न केले. या अभियानात सौरभ घोरपडे, प्रतीक जठार, अंकित शर्मा, माहीन मुल्ला, भूषणा पाटणकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.