शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले, कामावर ठेवणाऱ्या मालकाने पोलिस ठाण्यात नोंदणी न केल्यास गुन्हा दाखल होणार 

By शोभना कांबळे | Updated: May 16, 2024 19:09 IST

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात.

रत्नागिरी : तालुक्यातील पावस नजीकच्या गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले उचलली आहेत. या गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी त्यांची नोंदणी संबंधित पोलिस ठाण्यात न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे आता या गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनाही जातीने या गुरख्यांची नोंदणी करावी लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात. या नेपाळी व्यक्तींकडे त्यांच्या देशाचे आधारकार्ड असते. देशात किंवा कोकणात कामाला ठेवल्यानंतर त्यांची माहिती मालकाने पोलिस ठाण्यात सादर करणे यापुर्वीही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नेपाळ्यांना रखवालदार म्हणून चार - पाच महिने कामावर ठेवून घेतले जाते. हंगाम संपला की त्यांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे बरेचदा ते आपल्या गावाला परत जातात.

गेल्या वीस वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अशा नेपाळी रखवालदारांकडून गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. परप्रांतीय खलाशी, बागेतील कामगार यांच्यामध्ये वाद होतात, खून होतात. तपास करताना लक्षात येते की पोलिसांकडे अशा अनेक कामगारांची नोंद नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासात अनेक अडचणी येतात. बरेचदा असे रखवालदार गुन्हे करून त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्या घटनेचा तपास होऊ शकत नाही. बरेचदा एका नेपाळ्याकडून दुसऱ्या नेपाळ्याला कामाला ठेवले जाते. आंबा बागायती या एका बाजुला असल्याने नेपाळी रखवालदारांमध्ये आपापसात हाणामारी होऊन खूनाचे प्रकार घडतात. मात्र, काही वेळा त्यांच्या मालकांनाच त्याच्या रखवालदाराबाबत माहिती नसल्याने पोलिसांसमोर अडचणी येतात.

रत्नागिरीत असे प्रकार वाढल्याने जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात आंबा, मासेमारीसाठी येणाऱ्या नेपाळी व्यक्तींची त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी  पोलीस स्थानकात नोंदणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करणाऱ्या आंबा बागायतदार, नौका मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नेपाळी लोकांकडे त्यांच्या देशाने दिलेले आधारकार्ड असते. रत्नागिरी जिल्ह्यात कामाला असलेल्या नेपाळी लाेकांकडून अनेक गुन्हे घडले आहेत. मात्र, त्याची माहिती पोलिस ठाण्यात दिलेली नसल्याने अनेकदा तपास होऊ शकत नाही. त्यामुळे हे वाढते गुन्हे लक्षात घेऊन त्याच्यावर आळा बसण्यासाठी त्यांच्या मालकांनी कामावर ठेवताना त्यांची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी. न दिल्यास मालकांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- धनंजय कुलकर्णी. जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी 

टॅग्स :Policeपोलिस