शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले, कामावर ठेवणाऱ्या मालकाने पोलिस ठाण्यात नोंदणी न केल्यास गुन्हा दाखल होणार 

By शोभना कांबळे | Updated: May 16, 2024 19:09 IST

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात.

रत्नागिरी : तालुक्यातील पावस नजीकच्या गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नेपाळी रखवालदारांबाबत कडक पावले उचलली आहेत. या गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी त्यांची नोंदणी संबंधित पोलिस ठाण्यात न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे आता या गुरख्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनाही जातीने या गुरख्यांची नोंदणी करावी लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतींच्या रखवालीसाठी तसेच मच्छिमारी नाैकेवर खलाशी म्हणून सुमारे १५,००० ते २०,००० इतके नेपाळी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. मात्र, पोलिसांकडे केवळ ४२०० जणांचीच नोंदणी झालेली आहे. आंबा बागायतींमध्ये असणारे रखवालदार आंबा हंगाम संपला की परत त्यांच्या मूळ गावी जातात. या नेपाळी व्यक्तींकडे त्यांच्या देशाचे आधारकार्ड असते. देशात किंवा कोकणात कामाला ठेवल्यानंतर त्यांची माहिती मालकाने पोलिस ठाण्यात सादर करणे यापुर्वीही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नेपाळ्यांना रखवालदार म्हणून चार - पाच महिने कामावर ठेवून घेतले जाते. हंगाम संपला की त्यांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे बरेचदा ते आपल्या गावाला परत जातात.

गेल्या वीस वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अशा नेपाळी रखवालदारांकडून गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. परप्रांतीय खलाशी, बागेतील कामगार यांच्यामध्ये वाद होतात, खून होतात. तपास करताना लक्षात येते की पोलिसांकडे अशा अनेक कामगारांची नोंद नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासात अनेक अडचणी येतात. बरेचदा असे रखवालदार गुन्हे करून त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्या घटनेचा तपास होऊ शकत नाही. बरेचदा एका नेपाळ्याकडून दुसऱ्या नेपाळ्याला कामाला ठेवले जाते. आंबा बागायती या एका बाजुला असल्याने नेपाळी रखवालदारांमध्ये आपापसात हाणामारी होऊन खूनाचे प्रकार घडतात. मात्र, काही वेळा त्यांच्या मालकांनाच त्याच्या रखवालदाराबाबत माहिती नसल्याने पोलिसांसमोर अडचणी येतात.

रत्नागिरीत असे प्रकार वाढल्याने जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात आंबा, मासेमारीसाठी येणाऱ्या नेपाळी व्यक्तींची त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांनी  पोलीस स्थानकात नोंदणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करणाऱ्या आंबा बागायतदार, नौका मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नेपाळी लोकांकडे त्यांच्या देशाने दिलेले आधारकार्ड असते. रत्नागिरी जिल्ह्यात कामाला असलेल्या नेपाळी लाेकांकडून अनेक गुन्हे घडले आहेत. मात्र, त्याची माहिती पोलिस ठाण्यात दिलेली नसल्याने अनेकदा तपास होऊ शकत नाही. त्यामुळे हे वाढते गुन्हे लक्षात घेऊन त्याच्यावर आळा बसण्यासाठी त्यांच्या मालकांनी कामावर ठेवताना त्यांची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी. न दिल्यास मालकांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- धनंजय कुलकर्णी. जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी 

टॅग्स :Policeपोलिस