शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

वादळाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास, सर्वाधिक नुकसान राजापूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:19 IST

अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक आता क्यार वादळाने पूर्णत: ओरबाडून नेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर क्यार वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला व जनावरांना वर्षभर पोसायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत सर्वसामान्य शेतकरी आपले जमीनदोस्त झालेले पीक गोळा करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देवादळाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास, सर्वाधिक नुकसान राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पीकपाण्याची नोंदच नसल्याने शेतकरी अडचणीत

विनोद पवार राजापूर : अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक आता क्यार वादळाने पूर्णत: ओरबाडून नेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर क्यार वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला व जनावरांना वर्षभर पोसायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत सर्वसामान्य शेतकरी आपले जमीनदोस्त झालेले पीक गोळा करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.राजापूर तालुक्यातील सुमारे ८५० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे २३७ गावे अतिवृष्टी व क्यार वादळामुळे बाधित झाली असून, कृषी, महसूल व पंचायत समितीचे १०० पंचनामे करण्यात गुंतलेले आहेत. तालुक्यातील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामही युध्दपातळीवर सुरु आहे.शेतात पाणीच पाणीक्यार वादळ व लांबलेला परतीचा पाऊस यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणी अद्याप शेतात पाणीच पाणी आहे. त्यामुळे गुडघाभर चिखलात उभे राहून उभे पीक कापावे लागत आहे. हे कापलेले भात पुन्हा शेताच्या बाहेर काढून वाळत घालावे लागत आहे. परिणामी शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत आहे.

अनेक ठिकाणी आडवे झालेले भात पुन्हा रूजून आल्याने शेतकऱ्यांनी ते तसेच शेतात ठेवले आहे. तर भिजलेले भात पीठूळ होण्याची भीतीही शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.प्लास्टिकचा खर्च वाढलापरतीच्या पावसाने आठ दिवस संततधार लावल्याने पूर्ण तयार झालेले पीक कापून प्लास्टिकच्या कागदाखाली झाकून ठेवलेले दिसत असून, झोडणी झाल्यावरही ते प्लास्टिकवर उन्हात वाळत घालावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना नाहक दुष्काळात तेरावा महिना असे म्हणत प्लास्टिक खरेदी करावे लागले आहे. आधीच शेतीवर केलेला खर्चही निघत नसताना हा प्लास्टिकचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.पीकपाण्याची नोंदच नाहीशासन नुकसानभरपाई देईल, या आशेवर असणाऱ्या राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारी बाबुंच्या अनागोंदी कारभाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये तलाठ्यानी सातबारा उताऱ्यावर पीकपाण्याची नोंदच घातली नसल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना, अशी अवस्था तालुक्यातील शेतकरीवर्गाची झाली आहे.

राहिलेल्या नोंदी लवकरात लवकर घालून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, असे साकडे कुंभवडे येथील शेतकरी भाई सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व तहसीलदार प्रतिभा वराळे यांना घातले आहे.अधिकारी शेतावरराजापूर तालुक्यातील २३७ महसुली गावातील सुमारे ६२४० शेतकऱ्यांच्या ८५० हेक्टर जमीन क्षेत्रातील भात, नागली, आंबा, काजू व इतर पिकांचे परतीच्या पावसाने व वादळामुळे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशासनाने मेहनत घेत आजपर्यंत सुमारे ५० टक्के पंचनामे पूर्ण केले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या सर्वच विभागातील अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत.मच्छिमारांनाही क्यारचा फटकाक्यार वादळाचा फटका राजापूर तालुक्यातील मच्छिमारांनाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. तालुक्यातील नाटे, तुळसुंदे भागात अनेक मच्छिमार आहेत. साखरीनाटे व इतर भागातील लोकांना मासेमारी व्यवसायाशिवाय उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. जमीनच नाही पर्यायाने त्यांना मासेमारीवरच गुजराण करावी लागते.आधी अतिवृष्टी... आता क्यारकाहिशा उशिराने सुरु झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात जोरदार बरसायला सुरुवात केली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेती आठ दिवस पाण्याखाली गेली होती. पर्यायाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांचे क्यार वादळाने आणखीनच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे याआधीच झाले असले तरी त्याची कोणत्याही प्रकारची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून पुन्हा क्यारच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी