शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास, सर्वाधिक नुकसान राजापूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:19 IST

अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक आता क्यार वादळाने पूर्णत: ओरबाडून नेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर क्यार वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला व जनावरांना वर्षभर पोसायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत सर्वसामान्य शेतकरी आपले जमीनदोस्त झालेले पीक गोळा करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देवादळाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास, सर्वाधिक नुकसान राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पीकपाण्याची नोंदच नसल्याने शेतकरी अडचणीत

विनोद पवार राजापूर : अतिवृष्टीमुळे हातातून गेलेले पीक आता क्यार वादळाने पूर्णत: ओरबाडून नेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर क्यार वादळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबाला व जनावरांना वर्षभर पोसायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत सर्वसामान्य शेतकरी आपले जमीनदोस्त झालेले पीक गोळा करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.राजापूर तालुक्यातील सुमारे ८५० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे २३७ गावे अतिवृष्टी व क्यार वादळामुळे बाधित झाली असून, कृषी, महसूल व पंचायत समितीचे १०० पंचनामे करण्यात गुंतलेले आहेत. तालुक्यातील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामही युध्दपातळीवर सुरु आहे.शेतात पाणीच पाणीक्यार वादळ व लांबलेला परतीचा पाऊस यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणी अद्याप शेतात पाणीच पाणी आहे. त्यामुळे गुडघाभर चिखलात उभे राहून उभे पीक कापावे लागत आहे. हे कापलेले भात पुन्हा शेताच्या बाहेर काढून वाळत घालावे लागत आहे. परिणामी शेतकरीवर्गाची चांगलीच दमछाक होत आहे.

अनेक ठिकाणी आडवे झालेले भात पुन्हा रूजून आल्याने शेतकऱ्यांनी ते तसेच शेतात ठेवले आहे. तर भिजलेले भात पीठूळ होण्याची भीतीही शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.प्लास्टिकचा खर्च वाढलापरतीच्या पावसाने आठ दिवस संततधार लावल्याने पूर्ण तयार झालेले पीक कापून प्लास्टिकच्या कागदाखाली झाकून ठेवलेले दिसत असून, झोडणी झाल्यावरही ते प्लास्टिकवर उन्हात वाळत घालावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना नाहक दुष्काळात तेरावा महिना असे म्हणत प्लास्टिक खरेदी करावे लागले आहे. आधीच शेतीवर केलेला खर्चही निघत नसताना हा प्लास्टिकचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.पीकपाण्याची नोंदच नाहीशासन नुकसानभरपाई देईल, या आशेवर असणाऱ्या राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारी बाबुंच्या अनागोंदी कारभाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये तलाठ्यानी सातबारा उताऱ्यावर पीकपाण्याची नोंदच घातली नसल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना, अशी अवस्था तालुक्यातील शेतकरीवर्गाची झाली आहे.

राहिलेल्या नोंदी लवकरात लवकर घालून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, असे साकडे कुंभवडे येथील शेतकरी भाई सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व तहसीलदार प्रतिभा वराळे यांना घातले आहे.अधिकारी शेतावरराजापूर तालुक्यातील २३७ महसुली गावातील सुमारे ६२४० शेतकऱ्यांच्या ८५० हेक्टर जमीन क्षेत्रातील भात, नागली, आंबा, काजू व इतर पिकांचे परतीच्या पावसाने व वादळामुळे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशासनाने मेहनत घेत आजपर्यंत सुमारे ५० टक्के पंचनामे पूर्ण केले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या सर्वच विभागातील अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत.मच्छिमारांनाही क्यारचा फटकाक्यार वादळाचा फटका राजापूर तालुक्यातील मच्छिमारांनाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. तालुक्यातील नाटे, तुळसुंदे भागात अनेक मच्छिमार आहेत. साखरीनाटे व इतर भागातील लोकांना मासेमारी व्यवसायाशिवाय उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. जमीनच नाही पर्यायाने त्यांना मासेमारीवरच गुजराण करावी लागते.आधी अतिवृष्टी... आता क्यारकाहिशा उशिराने सुरु झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात जोरदार बरसायला सुरुवात केली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेती आठ दिवस पाण्याखाली गेली होती. पर्यायाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांचे क्यार वादळाने आणखीनच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे याआधीच झाले असले तरी त्याची कोणत्याही प्रकारची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून पुन्हा क्यारच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी