शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

शीळ येथे साठवण टाक्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:40 IST

अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी

ठळक मुद्देग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहेटाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरेअद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही

राजापूर : अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी रात्री घडली. यामध्ये साठवण टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामुळे लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवेमध्ये कमालीचा उष्मा वाढला आहे. त्यातून, नैसर्गिक जलस्रोत कमालीचे खालावले आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचत असून, त्या गावांनी पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. वाढत्या उष्म्यामध्ये अंगाची लाहीलाही होत असताना गेले दोन दिवस सायंकाळी तालुक्यामध्ये पाऊस पडला. 

पावसाच्या जोडीला सोसाट्याचा वाराही होता. त्याचा फटका अनेक आंबा बागायतदारांना बसला. या सोसाट्याच्या वाºयामध्ये शीळ वरची बाईतवाडी येथील पाण्याच्या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड कोसळून या टाक्यांचे नुकसान झाले आहे.

शीळ वरची बाईतवाडी ग्रामस्थांनी स्वखर्चाने खासगी नळपाणी योजना राबविली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील अर्जुना नदीवरून पाईपलाईन टाकून त्याद्वारे वाडीमध्ये पाणी आणले आहे. नदीवरून पाईपद्वारे आलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी दोन टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड पडल्याने टाक्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामध्ये ग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहे. 

सध्या वाढत्या उष्म्यामध्ये पाण्याचे स्रोत खालावले असून, पाणीटंचाईच्या झळा लोकांना पोहोचत आहेत. अशा स्थितीत आंब्याचे झाड कोसळून खासगी नळपाणी योजनेच्या साठवण टाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी