शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शीळ येथे साठवण टाक्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:40 IST

अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी

ठळक मुद्देग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहेटाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरेअद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही

राजापूर : अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी रात्री घडली. यामध्ये साठवण टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामुळे लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवेमध्ये कमालीचा उष्मा वाढला आहे. त्यातून, नैसर्गिक जलस्रोत कमालीचे खालावले आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचत असून, त्या गावांनी पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. वाढत्या उष्म्यामध्ये अंगाची लाहीलाही होत असताना गेले दोन दिवस सायंकाळी तालुक्यामध्ये पाऊस पडला. 

पावसाच्या जोडीला सोसाट्याचा वाराही होता. त्याचा फटका अनेक आंबा बागायतदारांना बसला. या सोसाट्याच्या वाºयामध्ये शीळ वरची बाईतवाडी येथील पाण्याच्या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड कोसळून या टाक्यांचे नुकसान झाले आहे.

शीळ वरची बाईतवाडी ग्रामस्थांनी स्वखर्चाने खासगी नळपाणी योजना राबविली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील अर्जुना नदीवरून पाईपलाईन टाकून त्याद्वारे वाडीमध्ये पाणी आणले आहे. नदीवरून पाईपद्वारे आलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी दोन टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड पडल्याने टाक्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामध्ये ग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहे. 

सध्या वाढत्या उष्म्यामध्ये पाण्याचे स्रोत खालावले असून, पाणीटंचाईच्या झळा लोकांना पोहोचत आहेत. अशा स्थितीत आंब्याचे झाड कोसळून खासगी नळपाणी योजनेच्या साठवण टाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी