शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती : प्रदीप साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:41 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri- रत्नागिरी शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.

ठळक मुद्देधूर, प्रदूषणापासून होणार मुक्ततापाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया

रत्नागिरी : शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.रत्नागिरी नगर परिषदेचा साळवी स्टॉप येथे कचरा डेपो असून, दररोज शहरातून कचरा संकलित केल्यानंतर त्याठिकाणी २२ टन कचरा डंप करण्यात येतो. कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो साठून कुजला आहे. सध्या पाचशे टनापेक्षा अधिक कचरा साठला आहे.

पाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते, त्यातून खत निर्मिती होते. मात्र, त्यासाठी मर्यादा असल्याने वर्षानुवर्षे हा कचरा तसाच साठल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. साठलेल्या कचऱ्यातून गॅस तयार होत असून अचानक आग लागते. परिणामी आग लागून धूर निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो. म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेला नोटीस बजावली होती.शहरातील वर्षानुवर्षे रखडलेला कचऱ्याचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येणार असून, त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया अत्याधुनिक मशीनद्वारे करून ह्यखत आणि खडीह्ण निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच अठरा लाखाची निविदा प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर महिनाभरात काम सुरू होणार आहे. येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे साठलेला कचरा नष्ट होऊन, साळवी स्टॉप येथील कचरा डेपो लवकरच रिकामे मैदान तयार होईल. कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती प्रकल्पासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभत आहे.- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiriरत्नागिरी