शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती : प्रदीप साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:41 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri- रत्नागिरी शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.

ठळक मुद्देधूर, प्रदूषणापासून होणार मुक्ततापाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया

रत्नागिरी : शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.रत्नागिरी नगर परिषदेचा साळवी स्टॉप येथे कचरा डेपो असून, दररोज शहरातून कचरा संकलित केल्यानंतर त्याठिकाणी २२ टन कचरा डंप करण्यात येतो. कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो साठून कुजला आहे. सध्या पाचशे टनापेक्षा अधिक कचरा साठला आहे.

पाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते, त्यातून खत निर्मिती होते. मात्र, त्यासाठी मर्यादा असल्याने वर्षानुवर्षे हा कचरा तसाच साठल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. साठलेल्या कचऱ्यातून गॅस तयार होत असून अचानक आग लागते. परिणामी आग लागून धूर निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो. म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेला नोटीस बजावली होती.शहरातील वर्षानुवर्षे रखडलेला कचऱ्याचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येणार असून, त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया अत्याधुनिक मशीनद्वारे करून ह्यखत आणि खडीह्ण निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच अठरा लाखाची निविदा प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर महिनाभरात काम सुरू होणार आहे. येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे साठलेला कचरा नष्ट होऊन, साळवी स्टॉप येथील कचरा डेपो लवकरच रिकामे मैदान तयार होईल. कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती प्रकल्पासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभत आहे.- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiriरत्नागिरी