शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती : प्रदीप साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:41 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri- रत्नागिरी शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.

ठळक मुद्देधूर, प्रदूषणापासून होणार मुक्ततापाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया

रत्नागिरी : शहरातील कचरा संकलित केल्यानंतर तो साळवी स्टॉप येथे डंप केला जातो. गेली अनेक वर्षे कचरा साठलेला असल्यामुळे गॅस तयार होऊन आग लागते, धूर पसरतो. यावर मार्ग काढताना, अत्याधुनिक मशीनद्वारे कचऱ्यापासून खडी आणि खत निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप साळवी व आरोग्य सभापती निमेश नायर यांनी दिली.रत्नागिरी नगर परिषदेचा साळवी स्टॉप येथे कचरा डेपो असून, दररोज शहरातून कचरा संकलित केल्यानंतर त्याठिकाणी २२ टन कचरा डंप करण्यात येतो. कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने तो साठून कुजला आहे. सध्या पाचशे टनापेक्षा अधिक कचरा साठला आहे.

पाच टनाचे एक युनिट उभारून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते, त्यातून खत निर्मिती होते. मात्र, त्यासाठी मर्यादा असल्याने वर्षानुवर्षे हा कचरा तसाच साठल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. साठलेल्या कचऱ्यातून गॅस तयार होत असून अचानक आग लागते. परिणामी आग लागून धूर निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो. म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगरपरिषदेला नोटीस बजावली होती.शहरातील वर्षानुवर्षे रखडलेला कचऱ्याचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येणार असून, त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया अत्याधुनिक मशीनद्वारे करून ह्यखत आणि खडीह्ण निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच अठरा लाखाची निविदा प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर महिनाभरात काम सुरू होणार आहे. येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे साठलेला कचरा नष्ट होऊन, साळवी स्टॉप येथील कचरा डेपो लवकरच रिकामे मैदान तयार होईल. कचऱ्यापासून खडी, खत निर्मिती प्रकल्पासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभत आहे.- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiriरत्नागिरी