शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आंब्यासाठी अद्याप १५ दिवसांची प्रतीक्षा, सर्वसामान्यांसाठी हापूसची चव कडूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:53 IST

१५ दिवसांनी बाजारात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसामान्यांना हापूसचा आस्वाद मे मध्येच घेता येणार आहे.

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने एप्रिल, मे महिना आंब्याचा हंगाम असतानाही बाजारात किरकोळ प्रमाणात आंबा उपलब्ध आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये केवळ २० ते २२ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आंब्याचे प्रमाण कमी असल्याने अजूनही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. १५ दिवसांनी बाजारात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसामान्यांना हापूसचा आस्वाद मे मध्येच घेता येणार आहे.

सध्या बाजारात आंबा किरकोळ प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाशी मार्केटमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतून २० ते २२ हजार पेट्या इतकाच आंबा विक्रीला जात आहे. दरवर्षी याचवेळी ८० हजार ते एक लाख पेट्या विक्रीला जातात. मात्र, यावर्षी उत्पादन कमी झाल्याने आंबा कमी आहे. आंब्यासाठी मागणी चांगली आहे, त्यामुळे सध्या तरी वाशी मार्केटमध्ये येणारा आंबा हातोहात संपत आहे.

अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, नीचांकी तापमान याचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यातील माेहराचा आंबा अत्यल्प होता, तो संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंब्याची पुनर्माेहरामुळे गळ झाली. तिसऱ्या टप्प्यात मोहर खूप होता. मात्र, अपेक्षित फळधारणा झाली नाही. चाैथ्या टप्प्यातील आंबा अद्याप तयार झालेला नाही. हा आंबा तयार होऊन बाजारात येईपर्यंत एप्रिल संपेल, अशी शक्यता बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.

दरवर्षी वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक या दिवसात मोठ्या प्रमाणावर असते. आवक वाढली की, दर गडगडतात. यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने दर अधिक आहे. ते सर्वसामान्यांसाठी परवडणारे नाहीत. मे महिन्यात आंब्याची आवक वाढल्यानंतर मुंबई मार्केटमधून सुरत, राजकोट, गुजरात, अहमदाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली मार्केटमध्ये आंबा विक्रीला पाठविला जाण्याची अपेक्षा आहे. आखाती प्रदेश व अन्य देशांत निर्यात होऊ शकते. मात्र, कोकणातून जाणाऱ्या आंब्याचे प्रमाणच कमी आहे. यावर्षी आंबा कमी असल्याने शेवटपर्यंत दर टिकतील, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा