शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

रत्नागिरीकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 16:50 IST

साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टाॅप येथील घनकचऱ्याचा प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मीटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशीनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेने घनकचरा प्रकल्प जागेअभावी रखडला आहे. दांडेआडोम येथील सुमारे ६ ते ७ एकर जागेचा विषय न्यायालयात नगर परिषदेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर नगर परिषदेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते. मात्र, हा प्रकल्प रद्द करण्यात आला.

आता हक्काची जागा सोडून नगर परिषदेच्या एमआडीसीतील जागेच्या मागे आहे. तसा प्रस्ताव दिला असला तरी अजून एमआयडीसीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांनी मंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या मदतीने काही कंपनीशी त्यांनी चर्चा केली. या कंपन्यांनी मोठमोठ्या शहरामध्ये डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले होते.

पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया

पहिल्या टप्प्यात २८ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. बायो मायनिंग मशीनद्वारे त्याचे खत तयार करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १ लाख ५६ हजार क्युबिक मीटर घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

...अशी होते प्रक्रिया

वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या घनकचरा जेसीबीने हलविला जातो. त्यावर बायो कल्चर हे रसायन मारून तो सुकवले जाते. त्यानंतर बायो मायनिंग या मशीनच्या पट्ट्यावर (बेल्टवर) जेसीबीने कचरा टाकला जातो. तो मशीनमध्ये आल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते. यात कचऱ्याचा विघटन होऊन प्लास्टिक बाजूला केले जाते. त्यानंतर तयार झालेले खत खाली पडते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी