शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

रत्नागिरीकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 16:50 IST

साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टाॅप येथील घनकचऱ्याचा प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मीटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशीनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेने घनकचरा प्रकल्प जागेअभावी रखडला आहे. दांडेआडोम येथील सुमारे ६ ते ७ एकर जागेचा विषय न्यायालयात नगर परिषदेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर नगर परिषदेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते. मात्र, हा प्रकल्प रद्द करण्यात आला.

आता हक्काची जागा सोडून नगर परिषदेच्या एमआडीसीतील जागेच्या मागे आहे. तसा प्रस्ताव दिला असला तरी अजून एमआयडीसीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांनी मंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या मदतीने काही कंपनीशी त्यांनी चर्चा केली. या कंपन्यांनी मोठमोठ्या शहरामध्ये डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले होते.

पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया

पहिल्या टप्प्यात २८ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. बायो मायनिंग मशीनद्वारे त्याचे खत तयार करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १ लाख ५६ हजार क्युबिक मीटर घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

...अशी होते प्रक्रिया

वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या घनकचरा जेसीबीने हलविला जातो. त्यावर बायो कल्चर हे रसायन मारून तो सुकवले जाते. त्यानंतर बायो मायनिंग या मशीनच्या पट्ट्यावर (बेल्टवर) जेसीबीने कचरा टाकला जातो. तो मशीनमध्ये आल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते. यात कचऱ्याचा विघटन होऊन प्लास्टिक बाजूला केले जाते. त्यानंतर तयार झालेले खत खाली पडते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी