शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

रत्नागिरीकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 16:50 IST

साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टाॅप येथील घनकचऱ्याचा प्रश्न हळूहळू मार्गी लागत आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मीटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशीनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेने घनकचरा प्रकल्प जागेअभावी रखडला आहे. दांडेआडोम येथील सुमारे ६ ते ७ एकर जागेचा विषय न्यायालयात नगर परिषदेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर नगर परिषदेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते. मात्र, हा प्रकल्प रद्द करण्यात आला.

आता हक्काची जागा सोडून नगर परिषदेच्या एमआडीसीतील जागेच्या मागे आहे. तसा प्रस्ताव दिला असला तरी अजून एमआयडीसीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांनी मंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या मदतीने काही कंपनीशी त्यांनी चर्चा केली. या कंपन्यांनी मोठमोठ्या शहरामध्ये डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले होते.

पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया

पहिल्या टप्प्यात २८ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ४ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. बायो मायनिंग मशीनद्वारे त्याचे खत तयार करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १ लाख ५६ हजार क्युबिक मीटर घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

...अशी होते प्रक्रिया

वर्षानुवर्षे साठून राहिलेल्या घनकचरा जेसीबीने हलविला जातो. त्यावर बायो कल्चर हे रसायन मारून तो सुकवले जाते. त्यानंतर बायो मायनिंग या मशीनच्या पट्ट्यावर (बेल्टवर) जेसीबीने कचरा टाकला जातो. तो मशीनमध्ये आल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते. यात कचऱ्याचा विघटन होऊन प्लास्टिक बाजूला केले जाते. त्यानंतर तयार झालेले खत खाली पडते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी