शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

उन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारले, रत्नागिरी अग्रस्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:55 IST

उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारलेराज्य परिवहन महामंडळ : मुंबई विभागात रत्नागिरी अग्रस्थानावर

रत्नागिरी : उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.वर्षभरातील दीर्घ सुटीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दि. १५ एप्रिल ते दि. १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले होते. शिवाय दररोज रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत होत्या.एप्रिल महिन्यात रत्नागिरी विभागाचा ६६ लाख ६८ हजार किलोमीटर प्रवास झाल्याने २१ कोटी ६६ लाख ८ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत ३ लाख ७ हजार किलोमीटरने प्रवास वाढला. शिवाय ३ कोटी ७१ लाख १७ हजाराने उत्पन्नात वाढले. मुंबई विभागात मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी विभाग येतात. सहा विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ९१ कोटी ७९ लाख १ हजार असून, गतवर्षी ८३ कोटी ७० लाख ११ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ८ कोटी ८ लाख ९० हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.मे महिन्यात रत्नागिरी विभागाने ८३ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळविले होते. गतवर्षी ८२ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत एक लाख किलोमीटर इतके अंतर वाढले, शिवाय २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांची उत्पन्नात वाढ झाली.

एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात पाचही विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ११४ कोटी ९३ लाख ८४ हजार असून, गतवर्षी १०८ कोटी ८६ लाख २३ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी ७ लाख ६१ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. रत्नागिरी विभागातील नऊ आगारामध्ये दापोली, खेड व गुहागर आगारांनीदेखील चांगले उत्पन्न मिळविले आहे. 

एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर १५ एप्रिलपासून १६ जूनपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे फक्त निवडणुका कालावधीत तीन दिवस उन्हाळी जादा गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद होत्या. परंतु प्रत्येक आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आल्यामुळेच रत्नागिरी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत जादा उत्पन्न मिळविले शिवाय मुंबई विभागातही अग्रस्थानी राहिला आहे.-विजय दिवटे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी