शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारले, रत्नागिरी अग्रस्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:55 IST

उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारलेराज्य परिवहन महामंडळ : मुंबई विभागात रत्नागिरी अग्रस्थानावर

रत्नागिरी : उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.वर्षभरातील दीर्घ सुटीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दि. १५ एप्रिल ते दि. १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले होते. शिवाय दररोज रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत होत्या.एप्रिल महिन्यात रत्नागिरी विभागाचा ६६ लाख ६८ हजार किलोमीटर प्रवास झाल्याने २१ कोटी ६६ लाख ८ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत ३ लाख ७ हजार किलोमीटरने प्रवास वाढला. शिवाय ३ कोटी ७१ लाख १७ हजाराने उत्पन्नात वाढले. मुंबई विभागात मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी विभाग येतात. सहा विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ९१ कोटी ७९ लाख १ हजार असून, गतवर्षी ८३ कोटी ७० लाख ११ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ८ कोटी ८ लाख ९० हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.मे महिन्यात रत्नागिरी विभागाने ८३ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळविले होते. गतवर्षी ८२ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत एक लाख किलोमीटर इतके अंतर वाढले, शिवाय २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांची उत्पन्नात वाढ झाली.

एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात पाचही विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ११४ कोटी ९३ लाख ८४ हजार असून, गतवर्षी १०८ कोटी ८६ लाख २३ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी ७ लाख ६१ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. रत्नागिरी विभागातील नऊ आगारामध्ये दापोली, खेड व गुहागर आगारांनीदेखील चांगले उत्पन्न मिळविले आहे. 

एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर १५ एप्रिलपासून १६ जूनपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे फक्त निवडणुका कालावधीत तीन दिवस उन्हाळी जादा गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद होत्या. परंतु प्रत्येक आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आल्यामुळेच रत्नागिरी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत जादा उत्पन्न मिळविले शिवाय मुंबई विभागातही अग्रस्थानी राहिला आहे.-विजय दिवटे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी