शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

उन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारले, रत्नागिरी अग्रस्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:55 IST

उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळी हंगामातील गर्दीने एसटीला तारलेराज्य परिवहन महामंडळ : मुंबई विभागात रत्नागिरी अग्रस्थानावर

रत्नागिरी : उन्हाळी सुटीमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली होती. रत्नागिरी विभागाने योग्य नियोजन करून मुंबई विभागात अग्रस्थान प्राप्त केले आहे. गतवर्षी मे महिन्यात २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.वर्षभरातील दीर्घ सुटीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दि. १५ एप्रिल ते दि. १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले होते. शिवाय दररोज रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत होत्या.एप्रिल महिन्यात रत्नागिरी विभागाचा ६६ लाख ६८ हजार किलोमीटर प्रवास झाल्याने २१ कोटी ६६ लाख ८ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत ३ लाख ७ हजार किलोमीटरने प्रवास वाढला. शिवाय ३ कोटी ७१ लाख १७ हजाराने उत्पन्नात वाढले. मुंबई विभागात मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी विभाग येतात. सहा विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ९१ कोटी ७९ लाख १ हजार असून, गतवर्षी ८३ कोटी ७० लाख ११ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ८ कोटी ८ लाख ९० हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.मे महिन्यात रत्नागिरी विभागाने ८३ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून ३१ कोटी २७ लाख ९९ हजाराचे उत्पन्न मिळविले होते. गतवर्षी ८२ लाख १३ हजार किलोमीटर प्रवास करून २८ कोटी ३३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत एक लाख किलोमीटर इतके अंतर वाढले, शिवाय २ कोटी ९४ लाख ५९ हजार रूपयांची उत्पन्नात वाढ झाली.

एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात पाचही विभागात रत्नागिरी विभाग उत्पन्नात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी मुंबई विभागाचे एकूण उत्पन्न ११४ कोटी ९३ लाख ८४ हजार असून, गतवर्षी १०८ कोटी ८६ लाख २३ हजार होते. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी ७ लाख ६१ हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. रत्नागिरी विभागातील नऊ आगारामध्ये दापोली, खेड व गुहागर आगारांनीदेखील चांगले उत्पन्न मिळविले आहे. 

एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर १५ एप्रिलपासून १६ जूनपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे फक्त निवडणुका कालावधीत तीन दिवस उन्हाळी जादा गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद होत्या. परंतु प्रत्येक आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आल्यामुळेच रत्नागिरी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत जादा उत्पन्न मिळविले शिवाय मुंबई विभागातही अग्रस्थानी राहिला आहे.-विजय दिवटे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी