शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विकास समितीमार्फत नारायण राणे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

खेड : कोकण विकास समितीमार्फत कोकणातील विविध समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने खेडमध्ये ...

खेड : कोकण विकास समितीमार्फत कोकणातील विविध समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने खेडमध्ये आलेले केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले.

कोकण विकास समिती या संघटनेत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरातील कार्यकर्ते काम करीत आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राणे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष जयवंत दरेकर, ऋषिकेश मोरे, सुनील शिंदे, अनिल कदम, अनिल फाळके, वैभव दरेकर, मनोज सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, महेश चव्हाण, प्रमोद कदम, हेमंत दरेकर, प्रवीण सुर्वे, भावेश सुर्वे व हर्षल भोसले आदी उपस्थित होते.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, दादर ते खेड-चिपळूण नवीन रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेसला खेड थांबा, कोकणातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच आरोग्य केंद्र, आधुनिक इमारतींसह अत्याधुनिक लॅब, सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. मशीन आदी अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा मिळाव्यात तसेच तज्ज्ञ, डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करावेत, आयएएस-आयपीएस व इतर सनदी अधिकारी तसेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीसारख्या स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी करून घेतली जाईल, अशी कोकण एज्युकेशन अकॅडमीची निर्मिती व्हावी, आय. टी. पार्क, तुळशी रोड जंक्शन - विन्हेरे - करंजाडी - नडगाव - सव - वहूर - दासगाव या नजीकच्या नवीन मार्गाची निर्मिती करावी, गणपती कालावधीमध्ये कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या मिळाव्यात आणि नवीन थांबे मिळावे, सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ असे नामांतर करावे, करंजाडी, सापे-वामने, विन्हेरे आणि दिवाण खवटी येथे गणपती विशेष गाड्यांना थांबे, मुंबई आणि सावंतवाडीदरम्यान नवीन इंटरसिटी सुरू करावी, दिवाणखवटी रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, कोळी बांधव तसेच कोकणातील बागायतदार यांना त्यांचे हक्काचे अस्तित्व निर्माण होईल, असे शासकीय स्तरावर प्रयन व्हावेत, स्वयंरोजगारासाठी तालुका, जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय बँकांना पतपुरवठा करण्यास केंद्र सरकारकडून आदेश व्हावेत, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात नवीन एमआयडीसीची निर्मिती व त्यामध्ये स्थानिक तसेच सलग तालुक्यांना नोकऱ्या व पूरक व्यवसायामध्ये संधी उपलब्ध व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.