शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

कोकण विकास समितीमार्फत नारायण राणे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

खेड : कोकण विकास समितीमार्फत कोकणातील विविध समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने खेडमध्ये ...

खेड : कोकण विकास समितीमार्फत कोकणातील विविध समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने खेडमध्ये आलेले केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले.

कोकण विकास समिती या संघटनेत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरातील कार्यकर्ते काम करीत आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राणे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष जयवंत दरेकर, ऋषिकेश मोरे, सुनील शिंदे, अनिल कदम, अनिल फाळके, वैभव दरेकर, मनोज सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, महेश चव्हाण, प्रमोद कदम, हेमंत दरेकर, प्रवीण सुर्वे, भावेश सुर्वे व हर्षल भोसले आदी उपस्थित होते.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, दादर ते खेड-चिपळूण नवीन रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेसला खेड थांबा, कोकणातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच आरोग्य केंद्र, आधुनिक इमारतींसह अत्याधुनिक लॅब, सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. मशीन आदी अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा मिळाव्यात तसेच तज्ज्ञ, डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करावेत, आयएएस-आयपीएस व इतर सनदी अधिकारी तसेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीसारख्या स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी करून घेतली जाईल, अशी कोकण एज्युकेशन अकॅडमीची निर्मिती व्हावी, आय. टी. पार्क, तुळशी रोड जंक्शन - विन्हेरे - करंजाडी - नडगाव - सव - वहूर - दासगाव या नजीकच्या नवीन मार्गाची निर्मिती करावी, गणपती कालावधीमध्ये कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या मिळाव्यात आणि नवीन थांबे मिळावे, सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ असे नामांतर करावे, करंजाडी, सापे-वामने, विन्हेरे आणि दिवाण खवटी येथे गणपती विशेष गाड्यांना थांबे, मुंबई आणि सावंतवाडीदरम्यान नवीन इंटरसिटी सुरू करावी, दिवाणखवटी रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, कोळी बांधव तसेच कोकणातील बागायतदार यांना त्यांचे हक्काचे अस्तित्व निर्माण होईल, असे शासकीय स्तरावर प्रयन व्हावेत, स्वयंरोजगारासाठी तालुका, जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय बँकांना पतपुरवठा करण्यास केंद्र सरकारकडून आदेश व्हावेत, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात नवीन एमआयडीसीची निर्मिती व त्यामध्ये स्थानिक तसेच सलग तालुक्यांना नोकऱ्या व पूरक व्यवसायामध्ये संधी उपलब्ध व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.