शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रत्नागिरीत येत्या शनिवारपासून राज्यस्तरीय काजू परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 15:53 IST

सर्वांगीण चर्चा होणार

रत्नागिरी : काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रक्रियाधारक यांना उभारी मिळण्याकरिता काजू प्रक्रियाधारक संघातर्फे शनिवार, ११ व रविवार, १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत राज्यस्तरीय काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रताप  पवार, सचिव संदेश पेडणेकर उपस्थित होते.गेली पाच वर्षे, काजू प्रक्रियाधारक संघ, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजारी काजू उद्योगाला उभारी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काजू कारखानदारांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व्हावे, केसरकर समिती अहवालाची अंमलबजावणी व्हावी, नियमित शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ व्हावे, नवीन उद्योजकांना बँकेच्या जाचक अटींमधून मुक्तता मिळावी,पणन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून काजू बीचे संकलन व्हावे, काजू कारखानदारांना वर्षभर काजू बी पुरवठा व्हावा यासाठी काजू बोर्डामार्फत तरतूद व्हावी, या विविध मागण्या मांडून संघटनेने वेळोवेळी शासनाकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.परिषदेसाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकम, विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत उपस्थित राहणार असल्याचे बारगीर यांनी सांगितले.सर्वांगीण चर्चा होणारया परिषदेमध्ये लागवड, नियोजन, अर्थकारण, बाजारभाव, तसेच काजू उद्योजकांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन, व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी