शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

भात पेरणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

पालेभाज्यांना मागणी रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी होत आहे. पालक, मुळा, माठ, मेथी, शेपू, कांदापात विक्रीस येत आहे. ...

पालेभाज्यांना मागणी

रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी होत आहे. पालक, मुळा, माठ, मेथी, शेपू, कांदापात विक्रीस येत आहे. १५ ते २० रुपये जुडी दराने भाज्यांची विक्री होत आहे. वालीच्या शेंगांची जुडी १५ रुपये दराने विकण्यात येत आहे. दुधी भोपळ्यास अधिक मागणी आहे.

खांब बदलण्याची मागणी

रत्नागिरी : शहराबरोबरच ग्रामीण भागातही विजेचे खांब गंजले आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुध्दा खांब बदलण्यात आलेले नाहीत. पावसाळा तोंडावर असल्याने तत्पूर्वी गंजलेले, सडलेले खांब बदलून अपघात टाळावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

कांद्याची आवक मंदावली

रत्नागिरी : पावसाळ्यासाठी कांदा खरेदी करून साठवून ठेवण्यात येतो. मात्र लाॅकडाऊनमुळे कांद्याची आवक वाढली आहे. अन्य जिल्ह्यातील शेतकरी कांदा ट्रक, टेम्पोतून विक्रीला आणत आहेत. २५ ते ३० रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. ४० ते ५० किलोची कांदा पिशवी खरेदी करण्यात येत आहे.

रस्त्याची दुरवस्था

रत्नागिरी : शहरातील आझादनगर, कोकणनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून, त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. मुख्य रस्त्याची साइडपट्टी दुरुस्त करण्यात आली असली तरी मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

कॅनिंग व्यवसायात मंदी

रत्नागिरी : आंबा कॅनिंगला सुरुवात झाली तरी यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे व्यवसायात प्रचंड मंदी आहे. त्यातच ताैक्ते वादळामुळे आंबा जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळातून बचावलेला आंबा शेतकरी काढत असले तरी दरही कमी लाभत आहे. कॅनिंगला येणाऱ्या आंब्यांचे प्रमाण अल्प आहे.

साथींचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : पाण्याची पातळी खालावल्यामुळे साथींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे शरीरातील पाणी कमी होणे त्यामुळे चक्कर येणे, उलटी-जुलाब, तापसरीसारख्या आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. कोरोनाचे संकट असल्याने नागरिक उपचारासाठी रुग्णालयात जाणे टाळत आहेत.

कार्यालयांत शुकशुकाट

रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या शासकीय कार्यालयांत उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात आले आहे. लाॅकडाऊनमुळे अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सतत गजबजणाऱ्या शासकीय कार्यालयांत शुकशुकाट जाणवत आहे.

आंबा विक्रीला

रत्नागिरी : बाजारात हापूस विक्रीला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अन्य राज्यातील आंबा विक्रीसाठी आला आहे. राघू (लंगडा) बदामी, केसर, लालबाग, दशहरी आदी विविध प्रकारचे आंबे विक्रीला आले असून, किलोवर विक्री होत असल्याने ग्राहकांनाही खरेदीसाठी परवडत आहे.

पालक चिंतित

रत्नागिरी : अद्याप बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शासनाने जाहीर केलेले नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची वेळ आली तरी अद्याप बारावीचे विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. शासनाने ऑफलाइन परीक्षा घेण्याचे जाहीर केले असले तरी वाढत्या कोरोनामुळे सद्य:स्थितीत तरी परीक्षेचे नियोजन करणे अवघड बनले आहे.