शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:01 IST

farmar, ratnagirinews पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभकिसान सन्मान योजना, २६ लाख ८० हजार जमा

रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळण्यासाठी मार्च २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत वर्षातून तीन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्याला सहा रूपये शासनाकडून देण्यात येतात. त्यासाठी तो भूधारक असावा, ही महत्वाची अट आहे. त्याचबरोबर तो आयकर दाता नसावा, पती - पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळेल, असे निकष या योजनेसाठी ठेवण्यात आले होते.या योजनेसाठी जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी काही शेतकऱ्यांना दोन वर्षात सहा टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रूपये एवढे पैसेही मिळाले होते. मात्र, केंद्र सरकारच्या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांपैकी काही आयकर दाते असल्याचे त्यांनी जोडलेल्या आधार क्रमांकावरून निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. आयकर दाते तसेच अन्य कारणाने अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे पैसे शासनाकडे जमा करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले होते.त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनी अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस काढल्या. त्यानुसार जिल्ह्यात २,४२१ शेतकरी आयकरदाते असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार, तर अन्य कारणांनी अपात्र असलेल्या ३,८३३ शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार एवढी रक्कम जमा झाली आहे. अजूनही ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करून घेतली जात आहे

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी