शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

संकटावर मात करण्यासाठी हिमतीने उभे राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

कोरोना महामारीमुळे गेले सव्वा वर्ष सर्वांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वचजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. सर्वच ...

कोरोना महामारीमुळे गेले सव्वा वर्ष सर्वांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वचजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. सर्वच पातळ्यांवर कोरोनाने सर्वांचीच अग्निपरीक्षा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा प्रसार, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या सर्व पातळ्यांवर आपण किती यशस्वी झालो, याचा सर्वस्तरावर विचार होणे आवश्यक आहे. कारण गेल्या सव्वा वर्षात आपण सर्वचजण लॉकडाऊनमध्ये जगत आहोत. हे सर्व करत असतानाच आपले प्रमुख उद्दिष्ट कोरोनाला रोखणे हेच आहे. कोरोनाने धुमाकूळ घातलेला असल्याने त्याचा फटका सर्वच उद्योग-व्यवसायांना बसला आहे.

ठराविक व्यवसाय सुरु असतानाच मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसाय बंद पडलेे आहेत. जे व्यवसाय सुरु आहेत त्यांना ठराविक वेळेतच सुरु ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनीही कोरोना नियमांचे पालन करुनच आपला व्यवसाय सुरु ठेवायचा असल्याने व्यावसायिकांना ते त्रासदायक ठरत आहे. मात्र, सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरलेले आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट कोसळलेले असतानाच महागाईचा आगडोंबही उसळला आहे. त्यामुळे नोकऱ्या, रोजगार गेलेला असतानाच कोरोनाव्यतिरिक्त महागाईचे मोठे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे आणखी किती संकटांना तोंड देणार, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. कोरोनाने रोजगार नेला, तर महागाईने खाण्याचेही वांदे झाले आहेत, अशी बिकट अवस्था झाली असून, जगायचं कसं, या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने या महामारीमध्ये जगण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, ही धडपड सुरु असतानाच महामारीतून वाचलो तर जगणार आहे आणि जगण्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तो सोडवायचा कसा, अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे एकीकडे दरी तर दुसरीकडे ओढा, त्यामुळे पाय कुठे टाकणार, अशा परिस्थितीमध्ये लाेक जगत आहेत. मात्र, मोलमजुरीही करता येत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, दोनवेळचे जेवणही मिळत नसेल तर एकवेळचा घास पोटात घालण्यासाठी काम कुठे करणार, सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्याने काम कोण देणार, कामही मिळेनासं झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करुनही हात रिकामेच आहेत, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले असून, सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ते कोणासमोर हात पसरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

आर्थिक व्यवसाय थांबल्यामुळे त्याचे दुष्परिणाम मनुष्यबळावर झाले आहेत. कोरोनामुळे जगंच आर्थिक संकटात सापडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले असले तरी भविष्यात आणखी किती जणांवर नोकरी गमावण्याची आणि किती जणांचे रोजगार बुडणार आहेत, अशी धडकी भरवणारी भीती अनेकांच्या मनात भरली आहे. त्यामुळे आज नोकरी, रोजगार असला तरी येणाऱ्या काळात तो राहिलच, असे नाही. त्यामुळे आहे ती नोकरी, रोजगार टिकवण्यावरच बहुतांश लोक भर देत आहेत. नोकरी, रोजगार नसला तर कुटुंबांचे पालनपोषण कसे करणार, ही भीती प्रत्येकाच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे कोरोनाने अनेकांना उद्ध्वस्त केले असले तरी आणखी कितीजणांना उद्ध्वस्त करणार आहे, असा विचार करण्याची वेळ आली असली, तरी प्रत्येकाने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हिमतीने, जिकरीने उभे राहण्याची गरज आहे.