शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

संकटावर मात करण्यासाठी हिमतीने उभे राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

कोरोना महामारीमुळे गेले सव्वा वर्ष सर्वांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वचजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. सर्वच ...

कोरोना महामारीमुळे गेले सव्वा वर्ष सर्वांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वचजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत. सर्वच पातळ्यांवर कोरोनाने सर्वांचीच अग्निपरीक्षा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा प्रसार, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या सर्व पातळ्यांवर आपण किती यशस्वी झालो, याचा सर्वस्तरावर विचार होणे आवश्यक आहे. कारण गेल्या सव्वा वर्षात आपण सर्वचजण लॉकडाऊनमध्ये जगत आहोत. हे सर्व करत असतानाच आपले प्रमुख उद्दिष्ट कोरोनाला रोखणे हेच आहे. कोरोनाने धुमाकूळ घातलेला असल्याने त्याचा फटका सर्वच उद्योग-व्यवसायांना बसला आहे.

ठराविक व्यवसाय सुरु असतानाच मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसाय बंद पडलेे आहेत. जे व्यवसाय सुरु आहेत त्यांना ठराविक वेळेतच सुरु ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनीही कोरोना नियमांचे पालन करुनच आपला व्यवसाय सुरु ठेवायचा असल्याने व्यावसायिकांना ते त्रासदायक ठरत आहे. मात्र, सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरलेले आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट कोसळलेले असतानाच महागाईचा आगडोंबही उसळला आहे. त्यामुळे नोकऱ्या, रोजगार गेलेला असतानाच कोरोनाव्यतिरिक्त महागाईचे मोठे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे आणखी किती संकटांना तोंड देणार, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. कोरोनाने रोजगार नेला, तर महागाईने खाण्याचेही वांदे झाले आहेत, अशी बिकट अवस्था झाली असून, जगायचं कसं, या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने या महामारीमध्ये जगण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, ही धडपड सुरु असतानाच महामारीतून वाचलो तर जगणार आहे आणि जगण्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तो सोडवायचा कसा, अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे एकीकडे दरी तर दुसरीकडे ओढा, त्यामुळे पाय कुठे टाकणार, अशा परिस्थितीमध्ये लाेक जगत आहेत. मात्र, मोलमजुरीही करता येत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, दोनवेळचे जेवणही मिळत नसेल तर एकवेळचा घास पोटात घालण्यासाठी काम कुठे करणार, सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्याने काम कोण देणार, कामही मिळेनासं झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करुनही हात रिकामेच आहेत, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले असून, सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ते कोणासमोर हात पसरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

आर्थिक व्यवसाय थांबल्यामुळे त्याचे दुष्परिणाम मनुष्यबळावर झाले आहेत. कोरोनामुळे जगंच आर्थिक संकटात सापडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले असले तरी भविष्यात आणखी किती जणांवर नोकरी गमावण्याची आणि किती जणांचे रोजगार बुडणार आहेत, अशी धडकी भरवणारी भीती अनेकांच्या मनात भरली आहे. त्यामुळे आज नोकरी, रोजगार असला तरी येणाऱ्या काळात तो राहिलच, असे नाही. त्यामुळे आहे ती नोकरी, रोजगार टिकवण्यावरच बहुतांश लोक भर देत आहेत. नोकरी, रोजगार नसला तर कुटुंबांचे पालनपोषण कसे करणार, ही भीती प्रत्येकाच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे कोरोनाने अनेकांना उद्ध्वस्त केले असले तरी आणखी कितीजणांना उद्ध्वस्त करणार आहे, असा विचार करण्याची वेळ आली असली, तरी प्रत्येकाने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हिमतीने, जिकरीने उभे राहण्याची गरज आहे.