शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील एसटी कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन, निलंबनाची कारवाई झाल्याने होते तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 13:25 IST

राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निलंबनाची कारवाई झाल्याने होते तणावात.

राजापूर : एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेला राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राकेश रमेश बांते (वय ३५) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.   ही घटना काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास  घडली. राजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांकडुन मिळाली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश बांते यांचा देखील समावेश होता. डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान अत्यावस्थ वाटु लागल्याने काल, बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालविली.मयत राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील असून, गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. ते पत्नी व चार वर्षे  एक व सव्वा वर्ष अशा दोन मुलांसह राजापुरात रहात होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरु होते भंडारा येथील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनिकरण करावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे. इतकेच नाही तर कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबण्याची कारवाई रद्द करण्यात येईल असेही सरकारने जाहीर केले आहे.सरकारच्या या आवाहनाला काही कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला. यानंतर एसटी सेवा काही प्रमाणात सुरळीत सुरु झाली. यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप