शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 16:15 IST

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे.कोरोनामुळे शाळांना दि. १५ मार्चपासूनच सुट्टी देण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या भूगोलाचा पेपर बोर्डाला ऐनवेळी रद्द करावा लागला होता. लॉकडाऊनमुळे पेपर तपासणी व निकाल तयार करण्याची प्रक्रिया लांबली. मात्र, बुधवारी दुपारी एक वाजता निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ४१३ शाळांमधून २३ हजार ७३६ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून २२८ शाळांमधील ११ हजार ८८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालक, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा बुधवारी संपली. दहावीच्या परीक्षेसाठी कोकण विभागातून ३५ हजार ६३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरवर्षी जूनमध्ये निकाल जाहीर होतो. परंतु यावर्षी दीड ते दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २२,५४७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२,५०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर २२,२११ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११,१८५ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. तर परीक्षेला ११,१८० विद्यार्थी बसले होते. परीक्षेत ११,०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण