शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 16:15 IST

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९८.२९ टक्के सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणाने बाजी मारली. राज्यात कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के इतका निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.२९ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.९३ टक्के लागला आहे.कोरोनामुळे शाळांना दि. १५ मार्चपासूनच सुट्टी देण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या भूगोलाचा पेपर बोर्डाला ऐनवेळी रद्द करावा लागला होता. लॉकडाऊनमुळे पेपर तपासणी व निकाल तयार करण्याची प्रक्रिया लांबली. मात्र, बुधवारी दुपारी एक वाजता निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ४१३ शाळांमधून २३ हजार ७३६ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून २२८ शाळांमधील ११ हजार ८८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालक, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा बुधवारी संपली. दहावीच्या परीक्षेसाठी कोकण विभागातून ३५ हजार ६३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरवर्षी जूनमध्ये निकाल जाहीर होतो. परंतु यावर्षी दीड ते दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २२,५४७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२,५०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर २२,२११ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११,१८५ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. तर परीक्षेला ११,१८० विद्यार्थी बसले होते. परीक्षेत ११,०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण