शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग, पुलाच्या उभारणीसाठी माती परीक्षण

By मनोज मुळ्ये | Updated: June 19, 2023 17:37 IST

एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार

रत्नागिरी : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग आला असून, काळबादेवी-मिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यातून मातीचा स्तर तपासण्यात येणार आहे. त्यानंतर पूल उभारणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गांतर्गत रस्ता रुंदीकरण, चाैपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, या रस्त्यासाठी १० हजार कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिऱ्या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण केले जात आहे. आठ दिवसांपूर्वी काळबादेवी येथे बोअरवेल खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ४० फूट खोल बोअरवेल पाडण्यात आली आहे. अजून १०० फूट खोदाई केली जाणार आहे. यामध्ये भूगर्भातील जमिनीचा स्तर तपासण्यात येणार आहे. काळबादेवी येथे ३, खाडीच्या पाण्यात ३ आणि मिऱ्या येथे किनाऱ्यावर तीन अशा नऊ जागांवर खोदाई करून नमुने घेण्यात येणार आहेत. हे काम पुढील दोन ते तीन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गhighwayमहामार्ग