शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खुशखबर; स्पेशल ट्रेनचे ओझे उतरणार; वाढीव तिकीट हाेणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 13:44 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून ...

शोभना कांबळेरत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी होण्याबरोबरच कोकणातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा नियमित धावणार असून त्यांचे तिकीट दरही पूर्ववत होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून सुमारे दीड वर्षानंतर पॅसेंजरची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच २२ मार्चपासून देशभरात लाॅकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सुमारे पाच महिने रेल्वेही बंदच होत्या. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, या गाड्या पूर्णपणे आरक्षित होत्या. त्यांचे तिकीट दरही भरमसाट होते. त्याचप्रमाणे या गाड्यांसाठी ठराविकच थांबे असल्याने सामान्य लोकांची गैरसोय होत होती.

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले, त्यामुळे डिसेंबरपासून बहुतांशी निर्बंध हटविण्यात आले. मात्र, पॅसेंजर गाड्या बंदच होत्या. सामान्य प्रवाशांकडून या गाड्या सुरू करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तसेच वेळ आणि श्रम वाचविणारा व सुखकारक असा रेल्वेचा प्रवास असल्याने, या गाड्यांची मागणी होत होती.

दिवाळीच्या हंगामात दोन पॅसेजर विशेष गाड्या म्हणून सुरू केल्या. आता या पॅसेंजर गाड्यांसह सर्वच गाड्या नियमित तिकिटासह सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- तेजस एक्स्प्रेस

- कोकण कन्या एक्स्प्रेस

- तुतारी एक्स्प्रेस

- मांडवी एक्स्प्रेस

- मंगला एक्स्प्रेस

गाड्यांची संख्या वाढणार

- सुमारे दीड वर्ष कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीच्या कमी दरापेक्षा तिप्पट - चाैपट दराने प्रवास करावा लागत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या कमी दरात या गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- त्यासाठी या विशेष गाड्या पूर्वीच्या तिकीट दरात सुरू करण्यात आल्या आहेत. तिकीट कमी असल्याने प्रवासी वाढणार असल्याने गाड्यांची संख्याही वाढेल.

पॅसेंजरची प्रतीक्षा संपली

रत्नागिरी - दादर (मुंबई) पॅसेंजर आणि दिवा - मडगाव या कोकण मार्गावर धावणाऱ्या दोन पॅसेजर गाड्या कोरोना काळात बंद राहिल्या. आता त्या नियमित दराने सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे भाडे १०० रुपयांच्या आत असल्याने सामान्यांना मुंबई प्रवास परवडणारा आहे.

तिप्पट तिकिटाचा बाेजा हाेणार कमी

रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा स्पेशल दर्जा हटविण्याचा निर्णय घेतला असून गाड्यांना पूर्वीचे क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आरक्षण प्रणालीही अद्ययावत केली जात आहे. त्यामुळे तिकीट दर कमी होणार आहेत.

आतापर्यंत कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांचे तिकीट दरही आता पूर्वीसारखे कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्वच प्रवाशांची पॅसेजर गाड्यांसाठी मागणी होती. ती मागणीही आता पूर्ण केली असून या पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करताना पूर्वीच्या तिकिटातच करता येणार आहे.- उपेंद्र शेंड्ये, क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक, रत्नागिरी विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे