शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

खुशखबर; स्पेशल ट्रेनचे ओझे उतरणार; वाढीव तिकीट हाेणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 13:44 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून ...

शोभना कांबळेरत्नागिरी : रेल्वे मार्गावरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या विशेष गाड्यांचे तिकीट दर कमी होण्याबरोबरच कोकणातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा नियमित धावणार असून त्यांचे तिकीट दरही पूर्ववत होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून सुमारे दीड वर्षानंतर पॅसेंजरची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच २२ मार्चपासून देशभरात लाॅकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सुमारे पाच महिने रेल्वेही बंदच होत्या. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, या गाड्या पूर्णपणे आरक्षित होत्या. त्यांचे तिकीट दरही भरमसाट होते. त्याचप्रमाणे या गाड्यांसाठी ठराविकच थांबे असल्याने सामान्य लोकांची गैरसोय होत होती.

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले, त्यामुळे डिसेंबरपासून बहुतांशी निर्बंध हटविण्यात आले. मात्र, पॅसेंजर गाड्या बंदच होत्या. सामान्य प्रवाशांकडून या गाड्या सुरू करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तसेच वेळ आणि श्रम वाचविणारा व सुखकारक असा रेल्वेचा प्रवास असल्याने, या गाड्यांची मागणी होत होती.

दिवाळीच्या हंगामात दोन पॅसेजर विशेष गाड्या म्हणून सुरू केल्या. आता या पॅसेंजर गाड्यांसह सर्वच गाड्या नियमित तिकिटासह सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- तेजस एक्स्प्रेस

- कोकण कन्या एक्स्प्रेस

- तुतारी एक्स्प्रेस

- मांडवी एक्स्प्रेस

- मंगला एक्स्प्रेस

गाड्यांची संख्या वाढणार

- सुमारे दीड वर्ष कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीच्या कमी दरापेक्षा तिप्पट - चाैपट दराने प्रवास करावा लागत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या कमी दरात या गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- त्यासाठी या विशेष गाड्या पूर्वीच्या तिकीट दरात सुरू करण्यात आल्या आहेत. तिकीट कमी असल्याने प्रवासी वाढणार असल्याने गाड्यांची संख्याही वाढेल.

पॅसेंजरची प्रतीक्षा संपली

रत्नागिरी - दादर (मुंबई) पॅसेंजर आणि दिवा - मडगाव या कोकण मार्गावर धावणाऱ्या दोन पॅसेजर गाड्या कोरोना काळात बंद राहिल्या. आता त्या नियमित दराने सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे भाडे १०० रुपयांच्या आत असल्याने सामान्यांना मुंबई प्रवास परवडणारा आहे.

तिप्पट तिकिटाचा बाेजा हाेणार कमी

रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा स्पेशल दर्जा हटविण्याचा निर्णय घेतला असून गाड्यांना पूर्वीचे क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आरक्षण प्रणालीही अद्ययावत केली जात आहे. त्यामुळे तिकीट दर कमी होणार आहेत.

आतापर्यंत कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांचे तिकीट दरही आता पूर्वीसारखे कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्वच प्रवाशांची पॅसेजर गाड्यांसाठी मागणी होती. ती मागणीही आता पूर्ण केली असून या पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करताना पूर्वीच्या तिकिटातच करता येणार आहे.- उपेंद्र शेंड्ये, क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक, रत्नागिरी विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे