शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

राज्यात भोंग्यावरुन वातावरण तापलं, रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावानं एक पाऊल पुढं टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:49 IST

शिवाजी गोरे दापोली : राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू असताना, दापोली तालुक्यातील सोंडेघर ...

शिवाजी गोरेदापोली : राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू असताना, दापोली तालुक्यातील सोंडेघर गावाने मात्र एक पाऊल पुढे टाकले आहे. या गावातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी एकत्र येत तब्बल १०० वर्षांचा सलोख्याचा करार केला आहे.

काही ना काही धार्मिक मुद्दे पुढे आणून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतो. मात्र, त्या साऱ्याचा परिणाम गावातील शांततेवर होऊ न देण्याचा निर्णय सोंडेघर वासीयांनी घेतला आहे. आजपर्यंत टिकून असलेला सामाजिक सलोखा यापुढेही कायम राहायला हवा, यासाठी २५ एप्रिलला ग्रामस्थांनी एकत्र बसून १०० वर्षांचा करार केला आहे.

बाराशे लोकवस्तीचे हे गाव. गेली अनेक वर्षे मुळातच येथे शांतता आहे. कोणताही सामाजिक, धार्मिक वादविवाद नाही. हीच शांततेची प्रथा पुढील पिढीकडे हस्तांतरित व्हावी, अशी अपेक्षा आता बुजुर्ग मंडळी करीत आहेत. गावातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधव गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. तीनही धर्मातील सण, उत्सवात सर्वजण एकत्रच असतात.

काही मतभेद किंवा कौटुंबिक, धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मातील बुजुर्ग मंडळी एकत्र बसून सामोपचाराने गावातल्या गावात वाद मिटवतात. त्यामुळे या गावातील वाद वेशीबाहेर जात नाहीत. गावातील कोणताही वाद पोलीस स्थानकापर्यंत नेला जात नाही. हेच वातावरण कायम राहावे, यासाठी तंटामुक्तीच्या माध्यमातून गावात सर्वानुमते सामाजिक सलोख्याचा शंभर वर्षांचा लिखित करार करण्यात आला.

ऐतिहासिक करार

गावातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारा हा करार भावी पिढीलाही बंधनकारक राहणार आहे. गेली काही वर्षे शांत असलेले हे गाव कायम शांतच राहावे, यासाठी दिनांक २५ एप्रिलला गावात एक बैठक झाली. या बैठकीला दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पालगडचे बीट अंमलदार विकास पवार, अंमलदार मिलिंद कदम उपस्थित होते. त्यांनीही या ऐतिहासिक करारात मोलाची भूमिका बजावली.

जिल्ह्यातील दुसरे गाव

याआधी सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी दापोली तालुक्यातीलच बुरोंडी गावातही १०० वर्षांचा सलोख्याचा करार करण्यात आला आहे. आता सोंडेघर हे दुसरे गाव बनले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी