शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

राज्यात भोंग्यावरुन वातावरण तापलं, रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावानं एक पाऊल पुढं टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:49 IST

शिवाजी गोरे दापोली : राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू असताना, दापोली तालुक्यातील सोंडेघर ...

शिवाजी गोरेदापोली : राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू असताना, दापोली तालुक्यातील सोंडेघर गावाने मात्र एक पाऊल पुढे टाकले आहे. या गावातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी एकत्र येत तब्बल १०० वर्षांचा सलोख्याचा करार केला आहे.

काही ना काही धार्मिक मुद्दे पुढे आणून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतो. मात्र, त्या साऱ्याचा परिणाम गावातील शांततेवर होऊ न देण्याचा निर्णय सोंडेघर वासीयांनी घेतला आहे. आजपर्यंत टिकून असलेला सामाजिक सलोखा यापुढेही कायम राहायला हवा, यासाठी २५ एप्रिलला ग्रामस्थांनी एकत्र बसून १०० वर्षांचा करार केला आहे.

बाराशे लोकवस्तीचे हे गाव. गेली अनेक वर्षे मुळातच येथे शांतता आहे. कोणताही सामाजिक, धार्मिक वादविवाद नाही. हीच शांततेची प्रथा पुढील पिढीकडे हस्तांतरित व्हावी, अशी अपेक्षा आता बुजुर्ग मंडळी करीत आहेत. गावातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधव गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. तीनही धर्मातील सण, उत्सवात सर्वजण एकत्रच असतात.

काही मतभेद किंवा कौटुंबिक, धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मातील बुजुर्ग मंडळी एकत्र बसून सामोपचाराने गावातल्या गावात वाद मिटवतात. त्यामुळे या गावातील वाद वेशीबाहेर जात नाहीत. गावातील कोणताही वाद पोलीस स्थानकापर्यंत नेला जात नाही. हेच वातावरण कायम राहावे, यासाठी तंटामुक्तीच्या माध्यमातून गावात सर्वानुमते सामाजिक सलोख्याचा शंभर वर्षांचा लिखित करार करण्यात आला.

ऐतिहासिक करार

गावातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारा हा करार भावी पिढीलाही बंधनकारक राहणार आहे. गेली काही वर्षे शांत असलेले हे गाव कायम शांतच राहावे, यासाठी दिनांक २५ एप्रिलला गावात एक बैठक झाली. या बैठकीला दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पालगडचे बीट अंमलदार विकास पवार, अंमलदार मिलिंद कदम उपस्थित होते. त्यांनीही या ऐतिहासिक करारात मोलाची भूमिका बजावली.

जिल्ह्यातील दुसरे गाव

याआधी सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी दापोली तालुक्यातीलच बुरोंडी गावातही १०० वर्षांचा सलोख्याचा करार करण्यात आला आहे. आता सोंडेघर हे दुसरे गाव बनले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी