शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीतील काही आमदार संपर्कात, प्रचिती लवकरच येईल; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

By मनोज मुळ्ये | Updated: May 10, 2023 13:22 IST

आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल

रत्नागिरी : महाविकास आघाडीतील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत. आपण जबाबदारीने हे बोलत आहोत आणि त्याची प्रचिती लवकरच महाराष्ट्राला येईल, असा गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.गेले काही दिवस महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे अंतर्गत पातळीवर आघाडीत बिघाडी झाली आहे. तीनही पक्ष एकत्र नसतील तर पुढच्या सर्व निवडणुका अवघड होतील, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच मंत्री सामंत यांच्या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लोक सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच हा बदल राज्याला दिसेल. हे विधान आपण जबाबदारीने करत आहोत, असे ते म्हणाले.१७२ आमदार आमच्या पाठीशी आहेत. आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.माती परीक्षण लवकरच संपेलबारसूमधील माती परीक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. तीन-चार दिवसात माती परीक्षणाच्या बोअर मारून पूर्ण होतील. त्यानंतर ही माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवली जाईल आणि प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच प्रकल्पाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. बारसू येथील कातळशिल्प प्रकल्पामध्ये घेण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही. ते शेतकऱ्यांकडेच राहील, त्यानंतर सरकार किंवा कंपनीच्या माध्यमातून ही कातळ शिल्प विकसित होतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी