शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

लोटे औद्योगिक वसाहत विस्तार समस्या संवादातून सुटेल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:17 IST

सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे.

ठळक मुद्देयावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी : संवादातून सर्व वाद सुटू शकतात याच भूमिकेतून शासन आपली भूमिका बजावेल. आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संवादासाठी पुढाकार घेतल्यावर विस्तारीत लोटे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटेल अशी खात्री राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे (ता. खेड) येथे व्यक्त केले.खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक संघटनेतर्फे आयोजित कोकण गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पी. अनबलगन, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन तसेच डॉ. सतीश वाघ आणि सोनजे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुभाष देसाई पुढे म्हणाले की, उद्योग विभागाकडून ज्या मागण्या येतात त्यावर सकारात्मक निर्णय घेतले जातात. तरी औद्योगिक विस्तारात पर्यावरणाचा विचार होईल याची काळजी उद्योजकांनी घ्यावी. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन असणारा मजबूत महाराष्ट्र घडवला जावा अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे.

सोबतच औद्योगिक सुरक्षेकडे सर्वांना लक्ष द्यावे व योग्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असेल याचीही जबाबदारी उद्योगांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात उद्योगांसमोरील अडचणी दूर करताना लागणाऱ्या परवान्यांची संख्या आम्ही २१पर्यंत आणली आहे. उद्योजक सर्वच बाबतीत उत्तमपणे काम करीत असतील तर याला शून्यापर्यंत नेण्यासही आपण तयार आहोत, असे ते म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.कोकण गौरव पुरस्काराचे वितरणएन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा अत्यंत कटकटीचा वेळखाऊ आणि खर्चिक प्रकार आहे. संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला इन्व्हरमेटर क्लिअरन्स घ्यावा. सीईटीपीच्या माध्यमातून ट्रीटमेंट केलेले पाणी दाभोळच्या खाडीत सोडले जाते त्या पाण्याच पाईपलाईन समुद्रापर्यंत न्यावी. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करावे अशा मागण्या उद्योजक संघटनेतर्फे यावेळी करण्यात आल्या. यावेळी चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग संस्था आणि कुडाळ येथील संशोधक देवधर यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMIDCएमआयडीसी