शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी बोगद्यात होणार सहा मार्गिका; - आपत्कालिन व्यवस्थाही उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:48 IST

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे. कशेडीकडून पोलादपूरच्या दिशेने पावणेदोन ...

ठळक मुद्दे - महामार्ग चौपदरीकरण

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे. कशेडीकडून पोलादपूरच्या दिशेने पावणेदोन किलोमीटर अंतराचा हा बोगदा होणार असून, त्यातील कशेडीपासून पुढे ३०० मीटरपर्यंत लांब असणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पोलादपूरच्या दिशेनेही बोगद्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे खेड ते पोलादपूर हे १ तासांचे अंतर आता अवघ्या १० ते १५ मिनिटांवर येणार आहे.दोन वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याचवेळी कशेडी घाटाच्या पायथ्यापासून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हद्दीतील भोगाव गावापर्यंत दोन्ही बाजूने बोगद्याचे काम सुरू आहे. येत्या १८ महिन्यांमध्ये दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा प्रवासाचे अंतर कमी होणार असून वेळही १ तासाने कमी होणार आहे. खेड कशेडी येथे काम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी ३ याप्रमाणे ६ मार्गिका तयार केल्या जात आहेत.काम पूर्ण होऊन या बोगद्यामधून वाहतूक सुरू झाल्यानंतर काही समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थाही तयार केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बोगद्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात एखाद्या वाहनाला मधूनच पुन्हा परत फिरायचे असेल तर तशी किंवा बंद पडलेले वाहन हलविण्याचीही व्यवस्था तेथे केली जाणार आहे.पुलांच्या कामाला वेग आवश्यकमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रत्नागिरीतील दोन टप्पे वगळता अन्यत्र टप्प्यांमध्ये जोरात सुरू आहे. काही ठिकाणी अडथळे आलेले असले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केला जात आहे. मात्र, आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटर लांबीच्या दोन टप्प्यांचे काम केवळ १० ते २० टक्के एवढेच झालेले आहे. महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या १४ पुलांच्या कामाला आता महामार्ग विभागाला वेग द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग