शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आंजर्ले समुद्रात सहाजण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 16:23 IST

Dapoli : पुण्यातील औंधमधील एका कंपनीत काम करणारे १४ पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. गुरूवारी हे सर्वजण येथीलच एका रिसॉर्टवर उतरले होते.

दापोली : पाण्याचा अंदाज न आल्याने दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनारी सहाजण बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, तिघांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील औंधमधील आहेत. अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे असे मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पुण्यातील औंधमधील एका कंपनीत काम करणारे १४ पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. गुरूवारी हे सर्वजण येथीलच एका रिसॉर्टवर उतरले होते. शुक्रवारी सकाळी हे सर्वजण आंजर्ले समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. त्यातील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पालांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी बुडणाऱ्या पर्यटकांची नाव आहेत. हे ६ जण पाण्यात ओढली गेली, त्यातील ३ जणांना स्थानिकांना वाचण्यात  यश आले. मात्र, अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे या तिघांचा बुडून मृत्यू झाला.

समुद्रात पर्यटक बुडत असताना अभिनय केळसकर, नितेश देवकर, नीलेश गुहागरकर, तृशांत भाटकर,अभिजीत भाटकर, बाळा केळसकर,आवा मयेकर,दीपा आरेकर, पप्पू केळसकर या स्थानिकांनी वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी