शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंजर्ले समुद्रात सहाजण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 16:23 IST

Dapoli : पुण्यातील औंधमधील एका कंपनीत काम करणारे १४ पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. गुरूवारी हे सर्वजण येथीलच एका रिसॉर्टवर उतरले होते.

दापोली : पाण्याचा अंदाज न आल्याने दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनारी सहाजण बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, तिघांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील औंधमधील आहेत. अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे असे मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पुण्यातील औंधमधील एका कंपनीत काम करणारे १४ पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. गुरूवारी हे सर्वजण येथीलच एका रिसॉर्टवर उतरले होते. शुक्रवारी सकाळी हे सर्वजण आंजर्ले समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. त्यातील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पालांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी बुडणाऱ्या पर्यटकांची नाव आहेत. हे ६ जण पाण्यात ओढली गेली, त्यातील ३ जणांना स्थानिकांना वाचण्यात  यश आले. मात्र, अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे या तिघांचा बुडून मृत्यू झाला.

समुद्रात पर्यटक बुडत असताना अभिनय केळसकर, नितेश देवकर, नीलेश गुहागरकर, तृशांत भाटकर,अभिजीत भाटकर, बाळा केळसकर,आवा मयेकर,दीपा आरेकर, पप्पू केळसकर या स्थानिकांनी वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी