शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 11:32 IST

तालुक्यातील जयगडच्या समुद्रात आज (१९ जुलै) सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे.

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : तालुक्यातील जयगडच्या समुद्रात आज (१९ जुलै) सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे बार्ज सिंगापूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तूंना हात न लावण्याचा सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत. हे बार्ज गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी लागले आहे. जयगड समुद्रात सकाळच्या दरम्यान, सिंगापूर कंपनीचं तेलवाहू बार्ज बुडत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या बार्जमधील वस्तू किनाऱ्यावर लागण्याची शक्यता असून, त्यातील तेलसाठा पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsingaporeसिंगापूर