शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा सिहाब चोत्तूर, स्वागतासाठी लोटले असंख्य रत्नागिरीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:15 IST

हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे.

रत्नागिरी : पवित्र हज यात्रेसाठी पायी निघालेल्या केरळच्या तीसवर्षीय सिहाब चोत्तूरच्या स्वागतासाठी पाली (ता. रत्नागिरी) येथे मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते. हवाईमार्गे हजयात्रा करणे सुलभ असताना श्रद्धा, चिकाटी या बळावर पायी जाण्याचे सिहाबचे ध्येय आहे. पाली येथे ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी सिहाबचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे. धर्म, जात बाजूला ठेवून केवळ आपल्या मित्राचे स्वप्न साकार होण्याच्या उद्देशाने तो त्याला सोबत करीत आहे. मात्र भारत देशाची सीमा पंजाबपर्यंत असल्याने श्याम तिथपर्यंत सोबत करणार आहे. श्याम सायकलवरून सिहाबबरोबर प्रवास करीत आहे.

मित्र घेत आहेत काळजी याशिवाय केरळ येथून आणखी दोन वाहनांतून त्याचे मित्र सोबत आले आहेत. हे मित्र वाहनातून सिहाबसाठी प्रवास करीत आहेत. पायी हजयात्रा पूर्ण करण्याची सिहाबची मनोकामना पूर्ण होण्यासाठी वाटेत त्याला कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी हे मित्र घेत आहेत. भारतातून पाकिस्तान व तेथून अन्य देशांत सिहाब मार्गाक्रमण करणार आहे. त्या-त्या देशांतील केरळवासीय भाविक त्याला पायी सोबत करणार आहेत.चालत निघालेल्या या यात्रेकरूचे सुरुवातीला पाली येथे उद्योजक अण्णा सामंत यांनी स्वागत केले. त्या वेळी मजगावचे सरपंच फैय्याज मुकादम, अजिम चिकटे, फैसल मुल्ला, मुझफ्फर मुकादम, तनवीर काजी, साहिल पठाण उपस्थित होते.

नियोजनासाठी तब्बल आठ वर्षे सोमवारी दुपारी एक वाजता हातखंबा येथे सिहाबचे आगमन होताच शेकडो हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्याचे स्वागत केले. हा नेत्रदीपक सोहळा मोबाईलमध्ये टिपण्यात आला. आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सिहाब याला नियोजन करण्यासाठी तब्बल आठ वर्षे लागली. केरळ ते रत्नागिरी हा २८ दिवसांचा पायी प्रवास जवळजवळ एक हजार किलोमीटर इतका झाला. पाच देश चालत गेल्यावर सौदी अरेबिया या देशात पोहोचायला त्याला सन २०२३ वर्ष उजाडणार आहे. त्याचा हा पायी प्रवास सुखाचा होवो आणि हजयात्रा पूर्ण होवो, ही प्रार्थना समस्त उपस्थितांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी