शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा सिहाब चोत्तूर, स्वागतासाठी लोटले असंख्य रत्नागिरीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:15 IST

हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे.

रत्नागिरी : पवित्र हज यात्रेसाठी पायी निघालेल्या केरळच्या तीसवर्षीय सिहाब चोत्तूरच्या स्वागतासाठी पाली (ता. रत्नागिरी) येथे मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते. हवाईमार्गे हजयात्रा करणे सुलभ असताना श्रद्धा, चिकाटी या बळावर पायी जाण्याचे सिहाबचे ध्येय आहे. पाली येथे ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी सिहाबचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.हज यात्रेसाठी पायी प्रवास करून हज पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेल्या सिहाबने दि. ३० मे रोजी केरळ येथून हज यात्रेला प्रारंभ केला. त्याच्यासमवेत त्याचा मित्र श्याम आहे. धर्म, जात बाजूला ठेवून केवळ आपल्या मित्राचे स्वप्न साकार होण्याच्या उद्देशाने तो त्याला सोबत करीत आहे. मात्र भारत देशाची सीमा पंजाबपर्यंत असल्याने श्याम तिथपर्यंत सोबत करणार आहे. श्याम सायकलवरून सिहाबबरोबर प्रवास करीत आहे.

मित्र घेत आहेत काळजी याशिवाय केरळ येथून आणखी दोन वाहनांतून त्याचे मित्र सोबत आले आहेत. हे मित्र वाहनातून सिहाबसाठी प्रवास करीत आहेत. पायी हजयात्रा पूर्ण करण्याची सिहाबची मनोकामना पूर्ण होण्यासाठी वाटेत त्याला कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी हे मित्र घेत आहेत. भारतातून पाकिस्तान व तेथून अन्य देशांत सिहाब मार्गाक्रमण करणार आहे. त्या-त्या देशांतील केरळवासीय भाविक त्याला पायी सोबत करणार आहेत.चालत निघालेल्या या यात्रेकरूचे सुरुवातीला पाली येथे उद्योजक अण्णा सामंत यांनी स्वागत केले. त्या वेळी मजगावचे सरपंच फैय्याज मुकादम, अजिम चिकटे, फैसल मुल्ला, मुझफ्फर मुकादम, तनवीर काजी, साहिल पठाण उपस्थित होते.

नियोजनासाठी तब्बल आठ वर्षे सोमवारी दुपारी एक वाजता हातखंबा येथे सिहाबचे आगमन होताच शेकडो हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्याचे स्वागत केले. हा नेत्रदीपक सोहळा मोबाईलमध्ये टिपण्यात आला. आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सिहाब याला नियोजन करण्यासाठी तब्बल आठ वर्षे लागली. केरळ ते रत्नागिरी हा २८ दिवसांचा पायी प्रवास जवळजवळ एक हजार किलोमीटर इतका झाला. पाच देश चालत गेल्यावर सौदी अरेबिया या देशात पोहोचायला त्याला सन २०२३ वर्ष उजाडणार आहे. त्याचा हा पायी प्रवास सुखाचा होवो आणि हजयात्रा पूर्ण होवो, ही प्रार्थना समस्त उपस्थितांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी