शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेशला सैन्यात भरती व्हायचे होते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:03 IST

पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला.

ठळक मुद्देसिद्धेशला सैन्यात भरती व्हायचे होते..!आधार बनू पाहण्याची त्याची इच्छा अधुरीच

देवरुख : पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला.

कुटुंबात एकुलता एक असलेल्या सिद्धेश झगडे याला सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने नुकतीच परीक्षादेखील दिली होती. मात्र, सैन्यात जाण्याची आणि कुटुंबाचा आधार बनू पाहण्याची त्याची ही इच्छा अधुरीच राहिली आहे.संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या हृतिक चंद्र्रकांत झगडे याला वाचवताना सिद्धेश रवींद्र झगडे (२०) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पट्टीचा पोहणाऱ्या सिद्धेशला सैन्यात जाण्याची इच्छा होती. गेल्याच महिन्यात त्याने सैन्यात जाण्यासाठी प्रवेश परीक्षाही दिली होती. पण काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सिद्धेशचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.सिद्धेशच्या निधनामुळे कळंबुशी गावावर शोककळा पसरली आहे. सिद्धेश हा रविवारी दुपारी मित्राला वाचवताना बुडाला होता. त्यानंतर तब्बल २० तासाने त्याचा मृतदेह सापडला. सिद्धेश व हृतिक हे एकाच कुटुंबातील असून, रविवारी ते दोघे व इतर दोघे जनावरे चारायला खाचारआगार येथील पाणलोट बंधाऱ्यांवर गेले होते.

दोन दिवसांपासून कळंबुशी-माखजन भागात जोरदार पाऊस पडत असल्याने गावनदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. रविवारी सुटी असल्याने हृतिकला पोहण्याचा मोह झाला व त्याने सिद्धेश व इतर दोघांनाही पोहायला जाऊया, असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला. यामुळे हृतिक हा एकटाच पोहायला गेला.

यावेळी त्याने बंधाऱ्यांजवळील डोहात उडी मारली. पण डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. हृतिक बुडत असल्याचे लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी सिद्धेशने पाण्यात उडी मारली. सिद्धेश हा पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने कसेबसे हृतिकला वाचवले. पण याचदरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने व डोह खोल असल्याने सिद्धेश मात्र पाण्यात बुडाला.सिद्धेश बुडाल्याचे बघताच मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली व झालेल्या घटनेबद्दल सिद्धेशच्या कुटुंबियांना सांगितले. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व शोधकार्य सुरू केले. यावेळी परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी