शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

कमी काळातील अतिवृष्टी, समुद्राच्या भरतीमुळे पूर; जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांनी केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 12:03 IST

चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी व त्याचवेळी आलेली भरती हेच महापुराचे ...

चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी व त्याचवेळी आलेली भरती हेच महापुराचे प्रमुख कारण आहे. पहिल्या दिवशी ७७६ मिलिमीटर, तर दुसऱ्या दिवशी ६१० मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरात कोळकेवाडी धरणाचे पाणी केवळ २ टक्केच होते. त्याने फारसा फरक पडलेला नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गाेगरे यांनी दिली.

वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव विजय गोगरे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मुख्य अभियंता गोगरे यांनी मंगळवारी चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीची पाहणी केली. त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात चिपळूण बचाव समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

समितीचे अरुण भोजने, बापू काणे, शहानवाज शाह, किशोर रेडीज, सतीश कदम, शिरीष काटकर, उदय ओतारी आदींनी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळाची परिस्थिती कथन केली. प्रत्यक्षात गाळ काढण्यासाठी यंत्रणा दाखल होत नाही व प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच सांगली, कोल्हापूरला वाचविण्यासाठी चिपळूणला बुडवल्याचा आरोपही समिती सदस्यांनी केला. गेल्या ५० वर्षांत नदीतील गाळ काढला नाही. तो न काढताच पूररेषा मारली गेल्याचे सांगितले.

जलसपंदाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांनी सांगितले की, वाशिष्ठी नदीची किमान ३ लाख क्युसेक्स पाण्याची वहन क्षमता असणे आवश्यक आहे. नद्यातील बेटे आणि गाळ काढल्यानंतर वहन क्षमता पाहिली जाईल. गाळ काढण्याच्या कामकाजात सुसूत्रता राहावी यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी व अन्य अधिकारी उपस्थित होते. आता गाळ उपसा कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा