शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कमी काळातील अतिवृष्टी, समुद्राच्या भरतीमुळे पूर; जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांनी केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 12:03 IST

चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी व त्याचवेळी आलेली भरती हेच महापुराचे ...

चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ व २३ जुलै रोजी कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी व त्याचवेळी आलेली भरती हेच महापुराचे प्रमुख कारण आहे. पहिल्या दिवशी ७७६ मिलिमीटर, तर दुसऱ्या दिवशी ६१० मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरात कोळकेवाडी धरणाचे पाणी केवळ २ टक्केच होते. त्याने फारसा फरक पडलेला नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गाेगरे यांनी दिली.

वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव विजय गोगरे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मुख्य अभियंता गोगरे यांनी मंगळवारी चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीची पाहणी केली. त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात चिपळूण बचाव समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

समितीचे अरुण भोजने, बापू काणे, शहानवाज शाह, किशोर रेडीज, सतीश कदम, शिरीष काटकर, उदय ओतारी आदींनी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळाची परिस्थिती कथन केली. प्रत्यक्षात गाळ काढण्यासाठी यंत्रणा दाखल होत नाही व प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच सांगली, कोल्हापूरला वाचविण्यासाठी चिपळूणला बुडवल्याचा आरोपही समिती सदस्यांनी केला. गेल्या ५० वर्षांत नदीतील गाळ काढला नाही. तो न काढताच पूररेषा मारली गेल्याचे सांगितले.

जलसपंदाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांनी सांगितले की, वाशिष्ठी नदीची किमान ३ लाख क्युसेक्स पाण्याची वहन क्षमता असणे आवश्यक आहे. नद्यातील बेटे आणि गाळ काढल्यानंतर वहन क्षमता पाहिली जाईल. गाळ काढण्याच्या कामकाजात सुसूत्रता राहावी यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी व अन्य अधिकारी उपस्थित होते. आता गाळ उपसा कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा