शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने सकाळी चार तास सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने सुधारित आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १४ एप्रिलच्या ...

रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने सुधारित आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १४ एप्रिलच्या आदेशास मंगळवारी रात्री पुरवणी आदेश काढले आहेत. त्यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी किराणा, दूध, भाजीपाला या दुकानांना आता सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपाेच सेवा देता येणार आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या या पुरवणी आदेशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यामधील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व औषधांची दुकाने पूर्ण वेळ खुली राहतील. नगरपालिका-नगरपंचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त आहे, ज्या भागामध्ये शहरीकरण वाढत आहे, अशा ठिकाणी किराणा मात्र दुकाने, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने व इतर दुकाने ही दिवसभर बंद राहतील. त्यांना अन्नधान्याचे व सामानाचे वितरण केवळ घरपोच करता येईल. मात्र, या भागात भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, विक्रेत्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील. त्यासाठी त्यांची आरटीपीसीआर तसेच अंंटिजेन चाचणीचे निगेटिव्ह अहवाल दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असेल. इतर वेळी व्यवसाय बंद राहील.

५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहतील. शासकीय स्वस्त धान्य दुकाने व केरोसीन दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू राहतील.

या सर्वासाठी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल. घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे, ॲंटिजन, आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील, त्याबाबतचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्यांना स्वत:कडे बाळगणे आवश्यक राहील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्‍ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.