शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने सकाळी चार तास सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने सुधारित आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १४ एप्रिलच्या ...

रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने सुधारित आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १४ एप्रिलच्या आदेशास मंगळवारी रात्री पुरवणी आदेश काढले आहेत. त्यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी किराणा, दूध, भाजीपाला या दुकानांना आता सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपाेच सेवा देता येणार आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या या पुरवणी आदेशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यामधील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व औषधांची दुकाने पूर्ण वेळ खुली राहतील. नगरपालिका-नगरपंचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त आहे, ज्या भागामध्ये शहरीकरण वाढत आहे, अशा ठिकाणी किराणा मात्र दुकाने, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने व इतर दुकाने ही दिवसभर बंद राहतील. त्यांना अन्नधान्याचे व सामानाचे वितरण केवळ घरपोच करता येईल. मात्र, या भागात भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, विक्रेत्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील. त्यासाठी त्यांची आरटीपीसीआर तसेच अंंटिजेन चाचणीचे निगेटिव्ह अहवाल दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असेल. इतर वेळी व्यवसाय बंद राहील.

५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहतील. शासकीय स्वस्त धान्य दुकाने व केरोसीन दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू राहतील.

या सर्वासाठी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल. घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे, ॲंटिजन, आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील, त्याबाबतचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्यांना स्वत:कडे बाळगणे आवश्यक राहील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्‍ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.