शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नाणार रद्दचे रत्नागिरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:54 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.

ठळक मुद्देनाणार रद्दचे रत्नागिरीत शिवसेनेकडून जंगी स्वागतशिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवले

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.राजापूर तालुक्यातील नाणारसह लगतच्या १४ गावांमध्ये शासनाने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला होता. येथील काही ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा देत प्रकल्प रद्द करण्याचा रेटा सुरूच ठेवला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे निवडणुकीतील युतीबाबतही साशंकता निर्माण झाली होती. भाजपबरोबर युती करताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती. ही अट मान्य करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. त्याचवेळी अधिग्रहीत जमीन परत करणार असून, जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. नाणार येथील हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करताच रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर आमदार राजन साळवी यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

यावेळी त्यांचेसमवेत संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, राहुल पंडित, प्रदीप साळवी, संजय साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी राजन साळवी यांनी सांगितले की, हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती. आज हा प्रकल्प रद्द झाल्याने कोकणी जनता आनंदीत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलेल्या घोषणेचे आम्ही स्वागत करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणी जनतेला वचन दिले होते ते पूर्ण झाले असल्याचेही साळवी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी