शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाणार रद्दचे रत्नागिरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:54 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.

ठळक मुद्देनाणार रद्दचे रत्नागिरीत शिवसेनेकडून जंगी स्वागतशिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवले

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.राजापूर तालुक्यातील नाणारसह लगतच्या १४ गावांमध्ये शासनाने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला होता. येथील काही ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा देत प्रकल्प रद्द करण्याचा रेटा सुरूच ठेवला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे निवडणुकीतील युतीबाबतही साशंकता निर्माण झाली होती. भाजपबरोबर युती करताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती. ही अट मान्य करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. त्याचवेळी अधिग्रहीत जमीन परत करणार असून, जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. नाणार येथील हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करताच रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर आमदार राजन साळवी यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

यावेळी त्यांचेसमवेत संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, राहुल पंडित, प्रदीप साळवी, संजय साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी राजन साळवी यांनी सांगितले की, हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती. आज हा प्रकल्प रद्द झाल्याने कोकणी जनता आनंदीत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलेल्या घोषणेचे आम्ही स्वागत करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणी जनतेला वचन दिले होते ते पूर्ण झाले असल्याचेही साळवी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी