शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खेडमधील सभेस गर्दी जमवण्यात शिवसेना झाली पास, पण...

By मनोज मुळ्ये | Updated: March 21, 2023 19:35 IST

रामदास कदम यांची जोरदार बॅटिंग

मनोज मुळ्येरत्नागिरी : मोठा गाजावाजा झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यात शिवसेना पास झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला झालेली गर्दी मोठी होती. अर्थात उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठीच्या या सभेत बहुतांश वक्त्यांचा भर ठाकरे यांच्यावर टीका करण्यावरच होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचा राष्ट्रवादी व काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयाबाबत तर रामदास कदम यांनी ठाकरे यांनी आपल्याला संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच पाढा पुन्हा वाचला.उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानावर सभा घेतली. मूळचे शिवसेनेचे आणि नंतर राष्ट्रवादीतून आमदार झालेल्या संजय कदम यांचा पक्षप्रवेश त्या सभेचा मुख्य हेतू होता. थोडक्यात, विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार यांच्याविरूद्ध रणशिंग फुंकण्याचाच तो प्रयत्न होता. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सभांप्रमाणेच चोर, मिंधे, गद्दार, खोके अशी विशेषणे वापरून टीका केली. ही सभा झाल्यानंतर लगेचच माजी मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर टीका केली आणि याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेची घोषणाही केली.रामदास कदम यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवार, १९ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. ‘त्याच मैदानावर निष्ठावंतांचा एल्गार’ असे फलक केवळ खेडच नाही तर दापोली, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरीतही झळकले. या सभेचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर असणार हे निश्चित होते. तशी चर्चाही समाजमाध्यमांमधून सुरू होती. प्रत्यक्षात तसेच झाले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर या दोघांच्या भाषणात ठाकरे यांच्यावरील टीकेचा भाग कमी होता. कदाचित पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी आपल्या भाषणाचा भर मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांवर अधिक होता. बाकी नेत्यांनी मात्र आपल्या भाषणातून ठाकरे यांच्यावर आसूड ओढले.उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दी म्हणजेच लोक अजूनही ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्याचवेळी हे लोक मतदार संघाबाहेरून आणल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या सभेला किती लोक येणार याकडेच सर्वांचे लक्ष होते. या सभेसाठी दापोली, खेड आणि मंडणगड या तालुक्यांमधून अनेक एस. टी. बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. सभेच्या आधी एकेका भागातून या बसेस खेडमध्ये आल्या आणि गोळीबार मैदान पूर्ण भरले होते. मैदानावरील खुर्च्या भरल्या होत्या. शिवाय अनेक लोक मैदानावर आणि बाहेर रस्त्यावरही उभे होते. काही हौशी लोक झाडावर चढून सभा ऐकत होते.

रामदास कदम यांची जोरदार बॅटिंगया सभेत सर्वाधिक आक्रमक भाषण शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले. कदम कुटुंबाला संपवण्याचे कसे कसे प्रयत्न झाले, हे पुन्हा सांगताना त्यांनी पुन्हा एकदा २००९च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. सत्ता आल्यानंतर आपल्याला रत्नागिरीचे पालकमंत्रिपद न देता ज्या इतरांना ते देण्यात आले, त्यांच्यावरही टीका केली. अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी ‘एपी’ असा केला. त्यांचे भाषण टाळ्या मिळवणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारे निवडणुकीच्या भाषणासारखे आक्रमक होते.

अर्धा तास समाचारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पहिला अर्धा तास आपल्याला मिळालेल्या वागणुकीचा, ठाकरे यांचा समाचार घेतला आणि नंतरचा अर्धा तास त्यांनी आपण मंजूर केलेल्या कामांची माहिती दिली.सामंत अन् अजानपालकमंत्री उदय सामंत यांनी तुलनेने सौम्य शब्दात ठाकरे यांच्यावर हल्ला केला. भाषणाच्या सुरुवातीलाच अजान झाल्याने ते शांत झाले. अजान संपल्यावर त्यांनी भाषण सुरू केले.

कदम यांचे षटकारआमदार योगेश कदम यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भाषण करुन अनेक षटकार मारले. त्यात त्यांनी ठाकरे यांच्यासाेबतच अन्य काही ज्येष्ठ आमदारांवरही टोकाची टीका केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRamdas Kadamरामदास कदमUday Samantउदय सामंत