शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शिवसेना संघटनेतच शिस्तीला हरताळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 22:43 IST

रत्नागिरी : नाचणे, गोळपमध्ये शिस्तीचा पंचनामा

रत्नागिरी : आदेशाला मान देणारे शिवसैनिक असे समीकरण बनलेले आहे. मात्र, गेल्या काही कालावधीत हे समीकरण बदलते आहे असे म्हणण्याजोगी स्थिती आहे. रत्नागिरीतील नाचणे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत पक्षांतर्गत वादातूनच सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करून पक्षादेश झुगारण्यात आला. तर गोळप ग्रामपंचायतीत शिवसेना सदस्यांमधील अंतर्गत राजकारणामुळे येणारी सत्ता गेली. पक्षशिस्तीला हरताळ फासणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची घोषणा होऊनही अद्याप काहीच कृती न झाल्याने घोषणा हवेत विरल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वीच झाली. नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व १७ सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी शिवसेनेतच जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यावेळी सेनेच्या वरिष्ठांकडून सरपंचपदासाठी आदेश देत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या पत्नी जयाली घोसाळे यांचे नाव निश्चित झाले होते. त्या बिनविरोध निवडून आल्या. मात्र, उपसरपंचपदासाठी भेय्या भोंगले हे सेनेतील नवीन गटाचे उमेदवार पक्षाने अधिकृत केले होते. मात्र, जयसिंग घोसाळे व भेय्या भोंगले यांचे राजकीय मतभेद असल्याने ग्रामपंचायत कारभारात पटणार नाही म्हणून भोंगले यांच्या नावाला विरोध झाला. त्यामुळे कपिल सुपल यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज भरला. शिवसेनेच्या सदस्यांनी भोंगले यांना मतदान करण्याचा पक्षादेश असतानाही तो धुडकावला व कपिल सुपल उपसरपंच म्हणून निवडून आले.याप्रकाराने शिवसेनेत खळबळ माजली. सेनेतील शिस्तीचा, पक्षादेशाचा पंचनामाच झाला. सेनेत आता शिस्त पाळली नाही तरी चालते, कारवाई होत नाही, असा समज बळावत चालला आहे. कारवाईची घोषणा सेना पदाधिकाऱ्यांनी केली परंतु कारवाई झालीच नाही. त्यामुळे सेनेतील पदाधिकारीही मवाळ बनले असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्येच सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)कारवाईची केवळ घोषणाच...संघटनात्मक पातळीवरील सेनेतील शिस्त ही महत्वाची मानली जात असतानाही तालुक्यात जुन्या नवीन शिवसैनिकांमध्ये अजूनही खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले नसल्याने मतभेदांची चर्चा नेहमीच सुरू असते. तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीत सेनेला सत्ता संपादन करण्याएवढे संख्याबळ उभे करता आले असते. मात्र, सरपंचपदावरून वाद काही मिटले नाहीत व सेनेची हाती येणारी सत्ता गेली. सेनेचा हा अनपेक्षित पराभव सर्वच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.