शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

‘शिपयार्ड’चे कर्मचारी वाऱ्यावर

By admin | Updated: August 28, 2015 23:41 IST

आर्थिक मंदीचे कारण : युनियनकडून कणखर भूमिका हवी

दापोली : तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक मंदीचे कारण पुढे करून सामान्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे. या प्रकरणी कामगार युनियनने कर्मचाऱ्यांच्या बाजूने कणखर भूमिका न घेतल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.गेल्या तीन वर्षापूर्वीपासूनचा दिवाळी बोनस, ओव्हरटाईम, फरकाच्या रकमा, प्रमोशन तसेच मागील सहा महिन्यांचा पगार कंपनीने थकवल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाची, घरातील व्यक्तींच्या आजारपणाची, तसेच इतर गरजांची पूर्तता कोठून करायची हा यक्ष प्रश्न कामगारांपुढे आवासून उभा ठाकलेला आहे. मात्र, भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थापन केलेल्या युनियन कमिटीस याचे कोणतेच सोयरसुतक नाही, असे दिसते. गेल्या ३ वर्षांपासून कामगार युनियन कमिटीने कामगारांच्या कोणत्याही समस्या जाणून घेतलेल्या नाहीत. तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. याउलट कामगार कमिटीने कंपनी व्यवस्थापनाशी जवळीक साधून आपल्या स्वत:चे प्रमोशन करून घेतले. तसेच थकीत पगारापैकी आपल्या स्वत:च्या काही रकमा काढून घेतल्या. कामगार कमिटीच्या नावाखाली कमिटी अध्यक्षांनी स्वत:चे नावावरती हाऊस किपिंंगचे कान्टॅ्रक्ट घेऊन लाखो रूपयांचा फायदा करून कामगार बांधवांची फसवणूक केली आहे. एखादा कामगार युनियन कमिटीकडे जाब विचारावयास गेल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कामगारांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कामगार युनियन कमिटीचा बेजबाबदारपणा, त्यांची हुकुमशाही यामुळे कंपनीत अनुचित प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष घालून कामागारांवर होत असणाऱ्या अन्यायाची चौकशी करावी. कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. अन्यथा संतप्त कामागारांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कंपनी प्रशासन, लेबर कमिशन जबाबदार राहतील. या सर्वप्रकाराची संबंधित शासकीय अ$ि$िधकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)