शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

By मनोज मुळ्ये | Updated: August 23, 2024 18:34 IST

महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा हाेतोय

मनोज मुळ्येरत्नागिरी : राजकारण कधीही एकसारखे राहत नाही, ही बाब रत्नागिरी जिल्ह्यात आता प्रकर्षाने पुढे येत आहे. आधीच महायुती फारशी एकत्र नव्हती आणि लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेसेना आणि भाजपमधील ताण अधिकच वाढले आहेत. त्यातल्या त्यात गुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर चारही मतदारसंघात शिंदेसेना आणि भाजपमध्ये वाद वाढलेले दिसतात. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष दोन वर्षांपूर्वी एकत्र आले. मात्र जिल्ह्यात अजूनही त्यांचे एकत्रीकरण झालेले नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने पहिल्यापासून या जागेसाठी दावा केला होता. आधी ही जागा शिवसेनेकडेच असल्याने ती शिंदेसेनेसाठी सोडली जाईल, असे वाटत होते. मात्र उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाल्यानंतर ही जागा अचानक भाजपसाठी सोडण्यात आली. हा शिंदेसेनेसाठी धक्का होता.त्यातच या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीन ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे शिंदेसेनेने अपेक्षित साथ दिली नसल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच महायुतीतील तेढ वाढली आहे.मित्रपक्षाकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अनेकदा केला आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका पाहता विधानसभेला शिंदेसेनेच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी भाजप करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे.रत्नागिरीसारखेच चित्र राजापूर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातही आहे. महायुतीत लोकसभेला दक्षिण रत्नागिरीप्रमाणेच उत्तर रत्नागिरीतही वाद सुरू झाले. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यानच माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजप तोफ डागली होती.दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून ढवळाढवळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केली होता आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. ते आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून काम करत असल्याचा आरोप कदम यांनी केला होता. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर दापाेलीतील भाजप अधिक सक्रिय झाली आहे. त्यातूनच हा वाद पुढे आला आहे. गेल्या आठवड्यात या वादाने तोंड फाेडण्याची भाषा करेपर्यंतचे टोक गाठले आहे. त्यामुळे महायुतीतील ताण अधिकच वाढला आहे. रामदास कदम यांच्या आरोपांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्याचा परिणाम म्हणून भाजपकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कदम यांचा निषेध करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेकडूनही जशास तसे उत्तर देण्याची भाषा वापरण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना होणारे हे वाद, ते मिटविण्यासाठी न हाेणारे प्रयत्न, स्थानिक पातळीवर दिले जाणारे खतपाणी हे सारे पाहता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत की काय, अशी शंका येत आहे. केवळ मंत्री उदय सामंत यांनीच वाद मिटविण्याची भूमिका घेतली. वरिष्ठ पातळीवरून मात्र प्रयत्न झाले नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRamdas Kadamरामदास कदम