शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

By मनोज मुळ्ये | Updated: August 23, 2024 18:34 IST

महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा हाेतोय

मनोज मुळ्येरत्नागिरी : राजकारण कधीही एकसारखे राहत नाही, ही बाब रत्नागिरी जिल्ह्यात आता प्रकर्षाने पुढे येत आहे. आधीच महायुती फारशी एकत्र नव्हती आणि लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेसेना आणि भाजपमधील ताण अधिकच वाढले आहेत. त्यातल्या त्यात गुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर चारही मतदारसंघात शिंदेसेना आणि भाजपमध्ये वाद वाढलेले दिसतात. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष दोन वर्षांपूर्वी एकत्र आले. मात्र जिल्ह्यात अजूनही त्यांचे एकत्रीकरण झालेले नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने पहिल्यापासून या जागेसाठी दावा केला होता. आधी ही जागा शिवसेनेकडेच असल्याने ती शिंदेसेनेसाठी सोडली जाईल, असे वाटत होते. मात्र उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाल्यानंतर ही जागा अचानक भाजपसाठी सोडण्यात आली. हा शिंदेसेनेसाठी धक्का होता.त्यातच या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीन ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे शिंदेसेनेने अपेक्षित साथ दिली नसल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच महायुतीतील तेढ वाढली आहे.मित्रपक्षाकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अनेकदा केला आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका पाहता विधानसभेला शिंदेसेनेच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी भाजप करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे.रत्नागिरीसारखेच चित्र राजापूर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातही आहे. महायुतीत लोकसभेला दक्षिण रत्नागिरीप्रमाणेच उत्तर रत्नागिरीतही वाद सुरू झाले. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यानच माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजप तोफ डागली होती.दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून ढवळाढवळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केली होता आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. ते आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून काम करत असल्याचा आरोप कदम यांनी केला होता. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर दापाेलीतील भाजप अधिक सक्रिय झाली आहे. त्यातूनच हा वाद पुढे आला आहे. गेल्या आठवड्यात या वादाने तोंड फाेडण्याची भाषा करेपर्यंतचे टोक गाठले आहे. त्यामुळे महायुतीतील ताण अधिकच वाढला आहे. रामदास कदम यांच्या आरोपांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्याचा परिणाम म्हणून भाजपकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कदम यांचा निषेध करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेकडूनही जशास तसे उत्तर देण्याची भाषा वापरण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना होणारे हे वाद, ते मिटविण्यासाठी न हाेणारे प्रयत्न, स्थानिक पातळीवर दिले जाणारे खतपाणी हे सारे पाहता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत की काय, अशी शंका येत आहे. केवळ मंत्री उदय सामंत यांनीच वाद मिटविण्याची भूमिका घेतली. वरिष्ठ पातळीवरून मात्र प्रयत्न झाले नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRamdas Kadamरामदास कदम