शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महर्षी कर्वे यांच्या स्मारकाची घाेषणा झाली; पुढे काय?, सतरा वर्षे उलटून गेली पायाही रचला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:39 IST

स्मारकासाठी शासनाकडून १ कोटी रुपये मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. परंतु, आजपर्यंत स्मारकाचा साधा पायाही रचण्याचे काम सुरू झालेले नाही.

शिवाजी गोरेदापोली : भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावात सरकारकडून २००५ साली स्मारक मंजूर केल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सतरा वर्षे उलटून गेली तरीही सरकारकडून स्मारक उभारणीचा पाया रचण्यात आला नाही. स्मारकाची घाेषणा करणाऱ्या सरकारला महर्षी अण्णासाहेब कर्वे स्मारकाचे वावडेच असल्याचे दिसत आहे.भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मुरूड हे मूळ गाव आहे. या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी गावकऱ्यांनी सहमती दर्शवली. स्मारकासाठी लागणारी चार गुंठे जागा स्मारक समितीकडे वर्गही करण्यात आली. स्मारकासाठी शासनाकडून १ कोटी रुपये मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. परंतु, आजपर्यंत स्मारकाचा साधा पायाही रचण्याचे काम सुरू झालेले नाही. हा प्रस्ताव शासनदरबारी आजवर धूळखात पडला आहे.

मूळ गावात स्मारक नसल्याची खंतभारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या मूळ गावात सरकारकडून स्मारकाची घोषणा करण्यात आली. मात्र, स्मारकाचा विषय शासन दरबारी अजूनही उपेक्षितच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या हयातीत उभारण्यात आलेला अर्धाकृती पुतळा अस्तित्वात आहे. पण, ‘भारतरत्न’च्या मूळ गावातच स्मारक नसल्याची खंत ग्रामस्थांना आहे.

विधवा महिला पुनर्विवाह, स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे थोर समाज सुधारक भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे स्मारक होण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्याउलट मुरुड गावातील स्मारक इतरत्र हलविण्याचा कुटिल डाव राजकीय पुढाऱ्यांकडून सुरू आहे. इतर महापुरुषांचे स्मारक त्यांच्या मूळ गावी होतात; मग महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे स्मारक का होत नाही? - विवेक भावे, सचिव, स्मारक समिती.

भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे स्मारक त्यांच्या मूळ गावात मुरुड येथेच झाले पाहिजे. महर्षी अण्णासाहेब आमच्या गावचे असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या मूळ गावात स्मारक होण्यासाठी ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, राजकीय मंडळींकडून केवळ आश्वासने दिली जातात. सरकारे आली आणि गेली; परंतु स्मारकाबाबत सरकार सकारात्मक कधी होणार? - जानकी बेलोसे, कार्याध्यक्ष, स्मारक समिती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी