शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

शासकीय तंत्रनिकेतनच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुमारे ४१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती ...

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुमारे ४१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य ए. एम. जाधव व प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. एफ. एच. पिंजारी यांनी दिली.

देशातील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनी -३३ , जी.ई. इंडिया -६, सीएट इंडिया -१ , फिलिप्स इंडिया-१ या कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या-२८ , इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या-११ , इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी ही इंजिनिअरिंगचे शिक्षण देणारी कोकण विभागातील एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे विद्यार्थी सरकारी तसेच खासगी क्षेत्रात देश- विदेशात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. संस्थेत इंजिनिअरिंगचे एकूण सहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात सिव्हिल इंजिनिअरिंग , मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग या शाखांचा

समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिकत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा म्हणून सहा आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील

विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र तीन अभ्यासक्रम शिकविले जातात.

या यशाबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तसेच संस्थेचे प्राचार्य ए. एम. जाधव यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी सर्वतोपरी जबाबदारी पार पाडत आहेत.