शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

जिल्ह्यात १८० पदांवर हंगामी भरती, कायम भरतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:02 IST

CoronaVIrus Ratnagiri : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले तरी ही भरती कंत्राटी पद्धतीचीच असल्याने त्याच्या प्रतिसादाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी भरतीऐवजी कायम भरती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १८० पदांवर हंगामी भरती, कायम भरतीची मागणीकंत्राटी पद्धतीच्या भरती प्रतिसादाबाबत शंकाच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले तरी ही भरती कंत्राटी पद्धतीचीच असल्याने त्याच्या प्रतिसादाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी भरतीऐवजी कायम भरती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.गतवर्षी मार्चपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. मात्र, पुढे त्याचे स्वरूप इतके मोठे होईल, याचा अंदाज कोणत्याही यंत्रणेला नव्हता. ऑगस्टपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले. गणेशोत्सव काळात झालेला फैलाव अधिक होता, असे चित्र तेव्हा निर्माण झाले होते. सप्टेंबरमध्ये त्याचे प्रमाण अगदीच टोकावर होते. मात्र, नंतर ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या घटू लागली. लोकांना दिलासा मिळाला. अगदी मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत हा दिलासा कायम होता. मात्र, त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली.सध्या रोज विक्रमी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण खूप वाढत आहे. त्यातच आधीपासून आरोग्य क्षेत्रात अनेक पदे रिक्त आहेत. गतवेळी कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सरकारने कंत्राटी भरती करण्याला मान्यता दिली होती. रत्नागिरी जिल्ह्यात त्यावेळी सुमारे ८०० कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करीत होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर त्यांची सेवा संपली. आता पुन्हा रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सहा फिजिशियन, ३७ भूलतज्ज्ञ, २ मायक्रोबायोलॉजिस्ट, १५ एमबीबीएस डॉक्टर्स, १२ आयुष वैद्यकीय अधिकारी, १६ लॅब टेक्निशियन आणि १०० परिचारिका घेतल्या जाणार आहेत.याआधी गतवर्षी घेतलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम केले जावे, अशी मागणी बराच काळ केली जात होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. या कंत्राटी डॉक्टर्स किंवा कर्मचाऱ्यांना पुढील काळातील नोकरीची हमी नसल्याने दोन-तीन महिन्यांसाठी काम स्वीकारण्याची मानसिकता कमी आहे. जे सेवेत आहेत, त्यांना नोकरीची, अन्य संरक्षणांची हमी आहे. ती हंगामी कर्मचाऱ्यांना नाही, असाही आक्षेप घेतला जात आहे.वेतनात वाढकंत्राटी कामासाठी डॉक्टर्सना आधी दिल्या जाणाऱ्या वेतनात २० हजार रुपयांची वाढ देण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आधीच केली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी तत्काळ प्रतिसादाची अपेक्षा केली जात आहे.रिक्त पदांसाठी हा पर्याय नाहीमुळात आरोग्य यंत्रणेत असंख्य पदे रिक्त आहेत. कोरोनाची साथ जरी संपली तरी नियमित आरोग्य सेवा देण्यासाठीच सध्याची पदे अपुरी आहेत. त्यामुळे सरकारने हंगामी कर्मचारी न घेता कायमस्वरूपी कर्मचारी घ्यावेत, अशी अपेक्षा कामाचा खूप ताण पडत असलेले कर्मचारीही करत आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या