शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

जिल्ह्यात १८० पदांवर हंगामी भरती, कायम भरतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:02 IST

CoronaVIrus Ratnagiri : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले तरी ही भरती कंत्राटी पद्धतीचीच असल्याने त्याच्या प्रतिसादाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी भरतीऐवजी कायम भरती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १८० पदांवर हंगामी भरती, कायम भरतीची मागणीकंत्राटी पद्धतीच्या भरती प्रतिसादाबाबत शंकाच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले तरी ही भरती कंत्राटी पद्धतीचीच असल्याने त्याच्या प्रतिसादाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी भरतीऐवजी कायम भरती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.गतवर्षी मार्चपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. मात्र, पुढे त्याचे स्वरूप इतके मोठे होईल, याचा अंदाज कोणत्याही यंत्रणेला नव्हता. ऑगस्टपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले. गणेशोत्सव काळात झालेला फैलाव अधिक होता, असे चित्र तेव्हा निर्माण झाले होते. सप्टेंबरमध्ये त्याचे प्रमाण अगदीच टोकावर होते. मात्र, नंतर ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या घटू लागली. लोकांना दिलासा मिळाला. अगदी मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत हा दिलासा कायम होता. मात्र, त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली.सध्या रोज विक्रमी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण खूप वाढत आहे. त्यातच आधीपासून आरोग्य क्षेत्रात अनेक पदे रिक्त आहेत. गतवेळी कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सरकारने कंत्राटी भरती करण्याला मान्यता दिली होती. रत्नागिरी जिल्ह्यात त्यावेळी सुमारे ८०० कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करीत होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर त्यांची सेवा संपली. आता पुन्हा रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सहा फिजिशियन, ३७ भूलतज्ज्ञ, २ मायक्रोबायोलॉजिस्ट, १५ एमबीबीएस डॉक्टर्स, १२ आयुष वैद्यकीय अधिकारी, १६ लॅब टेक्निशियन आणि १०० परिचारिका घेतल्या जाणार आहेत.याआधी गतवर्षी घेतलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम केले जावे, अशी मागणी बराच काळ केली जात होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. या कंत्राटी डॉक्टर्स किंवा कर्मचाऱ्यांना पुढील काळातील नोकरीची हमी नसल्याने दोन-तीन महिन्यांसाठी काम स्वीकारण्याची मानसिकता कमी आहे. जे सेवेत आहेत, त्यांना नोकरीची, अन्य संरक्षणांची हमी आहे. ती हंगामी कर्मचाऱ्यांना नाही, असाही आक्षेप घेतला जात आहे.वेतनात वाढकंत्राटी कामासाठी डॉक्टर्सना आधी दिल्या जाणाऱ्या वेतनात २० हजार रुपयांची वाढ देण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आधीच केली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी तत्काळ प्रतिसादाची अपेक्षा केली जात आहे.रिक्त पदांसाठी हा पर्याय नाहीमुळात आरोग्य यंत्रणेत असंख्य पदे रिक्त आहेत. कोरोनाची साथ जरी संपली तरी नियमित आरोग्य सेवा देण्यासाठीच सध्याची पदे अपुरी आहेत. त्यामुळे सरकारने हंगामी कर्मचारी न घेता कायमस्वरूपी कर्मचारी घ्यावेत, अशी अपेक्षा कामाचा खूप ताण पडत असलेले कर्मचारीही करत आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या