शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

भाड्याच्या जागेत शाळांची किलबिल

By admin | Updated: September 20, 2014 00:34 IST

जिल्हा परिषद : १४६ शाळांची अडचण कायम

रहिम दलाल -रत्नागिरी -स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळा भाड्याच्या इमारतींमध्ये भरविण्यात येत आहेत़ या शाळांच्या स्वत:च्या मालकीच्या इमारती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने वाड्या, वस्त्यांवर शाळा सुरु करुन शिक्षणाचा पाया खोलवर रुजविण्याचा प्रयत्न केला आहे़ मात्र, त्यासाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक होते़ मात्र, इमारतींचा विचार करीत असते तर आज अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये शिक्षणाचा पाया रुजू शकला नसता़ त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा सुरु करतानाच इमारती भाड्याने घेतल्या़जिल्हा परिषदेच्या २७४७ प्राथमिक शाळा आहेत़ या बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असल्याने अनेक शाळांच्या वर्गखोल्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून कोट्यवधी ्नरुपयांचा खर्च आल्या बांधण्यात आल्या आहेत़ तरीही आज जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळांच्या इमारती भाड्याच्या आहेत़ शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च शिक्षणावर करण्यात येत असताना गेल्या अनेक वर्षांपासून या शाळांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. या शाळांच्या इमारतीचे भाडे किरकोळ प्रमाणात असले तरी ते इमारतीच्या मालकांना वेळेवर मिळत नसल्याने ओरड सुरु आहे़ लाखो रुपयांचे भाडे अजूनही जिल्हा परिषदेकडून थकीत आहे.