शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

शाळांची घंटा वाजली, मात्र ऑनलाइनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा शासन निर्णयानुसार, मंगळवार दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळांची ...

रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा शासन निर्णयानुसार, मंगळवार दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळांची घंटा वाजली. मात्र, प्रत्यक्षात मुले वर्गात उपस्थित नव्हती. मात्र, शिक्षकांनी मुलांचे शब्दसुमनाने स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्याने, नवीन चेहऱ्यांची ओळख, तसेच मुलांशी शिक्षकांनी हितगुज केले.

जिल्हा परिषद, माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. ऑनलाइन अध्यापनाला शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप केले जाते. सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येतात. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी गतवर्षीच्या मुलांची पुस्तके सद्यस्थितीत उपलब्ध करून दिली आहेत.

ज्या गावात मोबाइल रेंज नाही, तेथील शाळा ग्रामस्थ, शिक्षक पालक संघाच्या परवानगीने प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आठवडाभरात ऑफलाइन व ऑनलाइन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे.