शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शाळांची घंटा वाजली, मात्र ऑनलाइनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा शासन निर्णयानुसार, मंगळवार दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळांची ...

रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा शासन निर्णयानुसार, मंगळवार दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळांची घंटा वाजली. मात्र, प्रत्यक्षात मुले वर्गात उपस्थित नव्हती. मात्र, शिक्षकांनी मुलांचे शब्दसुमनाने स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्याने, नवीन चेहऱ्यांची ओळख, तसेच मुलांशी शिक्षकांनी हितगुज केले.

जिल्हा परिषद, माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. ऑनलाइन अध्यापनाला शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप केले जाते. सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येतात. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी गतवर्षीच्या मुलांची पुस्तके सद्यस्थितीत उपलब्ध करून दिली आहेत.

ज्या गावात मोबाइल रेंज नाही, तेथील शाळा ग्रामस्थ, शिक्षक पालक संघाच्या परवानगीने प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आठवडाभरात ऑफलाइन व ऑनलाइन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे.