शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

टंचाई कृती आराखडा मंजूर

By admin | Updated: February 28, 2015 23:37 IST

जिल्हा परिषद : पाणीटंचाईसाठी यंदा पावणेदोन कोटी

रत्नागिरी : जिल्ह्याचा १९० गावातील ४९८ वाड्यांचा संभाव पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा १ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. तो आराखडा शासनाने मंजूर केला आहे. मात्र, यंदाचा आराखडा गतवर्षीपेक्षा निम्मा आहे. जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांत भिषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात. या उन्हाळ्यातील टंचाईवर कायमची मात करण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना यंदा मात्र पाणीटंचाई कमी जाणवेल, अशी जिल्हा परिषदेला आशा वाटत आहे. पाणीटंचाई आराखड्यातही यंदा खर्च कमी दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर्षीचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा १ कोटी ७६ लाख रुपयांचा आहे़ या आराखड्यातून विंधन विहिरींची कामे वगळण्यात आली आहेत़ कारण विंधन विहिरींच्या कामे डीपीडीसीमधून घेण्यात आलेली नाहीत. या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील १९० गावातील ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावणार आहे़ त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी १ कोटी ७६ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी १ कोटी १२ लाख ५० हजा रुपये, खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ७० हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे़ जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्याचा टंचाई कृती अराखडा जिल्हा प्रशासनाकडे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर केला होता. तो १ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. (शहर वार्ताहर)