शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चिपळुणात कातकरी समाजाचे ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन

By संदीप बांद्रे | Updated: December 12, 2022 18:58 IST

चिपळूण : वाशिष्ठी नदीला सती येथे येऊन मिळणाऱ्या नदीजवळ असलेल्या पुलाच्या ठिकाणी सोमवारी (१२ डिसेंबर) दिवसभर आदिवासी आदिम कातकरी ...

चिपळूण : वाशिष्ठी नदीला सती येथे येऊन मिळणाऱ्या नदीजवळ असलेल्या पुलाच्या ठिकाणी सोमवारी (१२ डिसेंबर) दिवसभर आदिवासी आदिम कातकरी संघटना, श्रमिक सहयोग, राष्ट्र सेवा दल, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय संघटनांनी एकदिवसीय ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी ‘बांधण वाचवा, आदिवासी वाचवा’, ‘हक्काचे आमचे मासे, टाकू नका जेसीबीचे फासे’ अशा घोषणा दिल्या.मागील महिन्यात २१ नोव्हेंबर रोजी सती नदीमध्ये गाळ उपसा कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागाचे जेसीबी उतरवण्यात आले. यामध्ये कातकरी समाजाचे चौदा बांधण उद्ध्वस्त केले गेले. हा एक बांधण तयार करायला २५ ते २७ हजार रुपये खर्च येतो. प्रत्यक्ष बांधण उद्ध्वस्त होत असताना उपस्थित कातकरी कुटुंबाने विनंती करूनही काम थांबवण्यात आले नव्हते.

उद्ध्वस्त केलेल्या ‘बांधण’ची नुकसान भरपाई देण्यात यावी, बांधण असलेल्या ठिकाणी सर्व्हेक्षण होऊन त्या ठिकाणांना संरक्षण मिळावे, गाळ उपसा कार्यक्रमापूर्वी स्वायत्त पर्यावरणीय संस्थेमार्फत नदीचा अभ्यास व्हावा व या अभ्यासामध्ये स्थानिक मासेमार आणि आदिवासी समाजाचे मत प्राधान्याने लक्षात घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी आदिवासी आदिम कातकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय जगताप, संजय जाधव, तालुका सचिव महेश जाधव, जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, सुरेश पवार, विजया निकम, केतन निकम, सँच्युरी एशियाचे प्रकल्प समन्वयक मल्हार इंदुलकर, श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर, डीबीजे महाविद्यालयाचे प्रा. राम साळवी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सचिव धीरज वाटेकर, महेंद्रगिरी निसर्ग मित्रचे अध्यक्ष अनिकेत चोपडे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी