शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

समाधानकारक पाऊस; शेतीच्या कामांना वेग

By admin | Updated: July 16, 2016 23:32 IST

१६ हजार मिमी पाऊस : ४९ हजार हेक्टरवर भात लागवड

रत्नागिरी : जिल्ह््यात आत्तापर्यंत एकूण १५९९०.०४ मिलिमीटर (सरासरी १७७६.६७) पाऊस झाला आहे. गेले चार दिवस पावसाने उसंत घेतली असली, तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. येथील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ४९ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह््यात किमान सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी तर २१३३.१३ मिलिमीटर इतकाच पाऊस जून ते आॅक्टोबरपर्यंत कोसळला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत चांगले राहिले आहे. शेतीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. जिल्ह््यात ६९ हजार ४७९ हेक्टरवर भात लागवड करण्यात येते. आत्तापर्यंत ४८ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येत असून, आत्तापर्यंत केवळ १०२० हेक्टर क्षेत्रावरच नागलीची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. भातशेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर नागली लागवड करण्यात येते. त्यामुळे येत्या आठवडाभरात नागली लागवडीची बहुतांश कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरी लागवड एकूण २९.३५ हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली आहे.कडधान्य लागवड १४९६ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. पैकी २३.१६ हेक्टर क्षेत्रावर ती करण्यात आली आहे. तसेच ११०१.२ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यात ५६९४.८ हेक्टर क्षेत्रावर भात, ५३६ हेक्टरवर नागली तर एक हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. लांजा तालुक्यात ५२११.२ हेक्टर क्षेत्रावर भात, तर चार हेक्टर क्षेत्रावर नागली, २३.१६ हेक्टरवर इतर कडधान्य, १०१.२ हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात ३३५१.२ हेक्टरवर भात, ६९ हेक्टरवर नागली, १५.३५ हेक्टरवर वरी, १० हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात २७८० हेक्टरवर भात व ६५ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात २६५२ हेक्टरवर भात, १६५ हेक्टरवर नागली तर १३ हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात ६४०२ हेक्टरवर भात व १७९ हेक्टरवर नागली लागवड करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात ६९८०, राजापूर ६८८०, संगमेश्वर ८१७४.५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पाण्याची उणीव भासणाऱ्या क्षेत्रात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. पाऊस कमी झाल्याने आता पाणथळ जागेतील भात लागवड करण्यात येत आहे. जुलै अखेरपर्यंत जिल्ह््यातील भात लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)