शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

समाधानकारक पाऊस; शेतीच्या कामांना वेग

By admin | Updated: July 16, 2016 23:32 IST

१६ हजार मिमी पाऊस : ४९ हजार हेक्टरवर भात लागवड

रत्नागिरी : जिल्ह््यात आत्तापर्यंत एकूण १५९९०.०४ मिलिमीटर (सरासरी १७७६.६७) पाऊस झाला आहे. गेले चार दिवस पावसाने उसंत घेतली असली, तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. येथील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ४९ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह््यात किमान सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी तर २१३३.१३ मिलिमीटर इतकाच पाऊस जून ते आॅक्टोबरपर्यंत कोसळला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत चांगले राहिले आहे. शेतीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. जिल्ह््यात ६९ हजार ४७९ हेक्टरवर भात लागवड करण्यात येते. आत्तापर्यंत ४८ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येत असून, आत्तापर्यंत केवळ १०२० हेक्टर क्षेत्रावरच नागलीची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. भातशेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर नागली लागवड करण्यात येते. त्यामुळे येत्या आठवडाभरात नागली लागवडीची बहुतांश कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरी लागवड एकूण २९.३५ हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली आहे.कडधान्य लागवड १४९६ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. पैकी २३.१६ हेक्टर क्षेत्रावर ती करण्यात आली आहे. तसेच ११०१.२ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यात ५६९४.८ हेक्टर क्षेत्रावर भात, ५३६ हेक्टरवर नागली तर एक हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. लांजा तालुक्यात ५२११.२ हेक्टर क्षेत्रावर भात, तर चार हेक्टर क्षेत्रावर नागली, २३.१६ हेक्टरवर इतर कडधान्य, १०१.२ हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात ३३५१.२ हेक्टरवर भात, ६९ हेक्टरवर नागली, १५.३५ हेक्टरवर वरी, १० हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात २७८० हेक्टरवर भात व ६५ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात २६५२ हेक्टरवर भात, १६५ हेक्टरवर नागली तर १३ हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात ६४०२ हेक्टरवर भात व १७९ हेक्टरवर नागली लागवड करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात ६९८०, राजापूर ६८८०, संगमेश्वर ८१७४.५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पाण्याची उणीव भासणाऱ्या क्षेत्रात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. पाऊस कमी झाल्याने आता पाणथळ जागेतील भात लागवड करण्यात येत आहे. जुलै अखेरपर्यंत जिल्ह््यातील भात लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)