शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

समाधानकारक पाऊस; शेतीच्या कामांना वेग

By admin | Updated: July 16, 2016 23:32 IST

१६ हजार मिमी पाऊस : ४९ हजार हेक्टरवर भात लागवड

रत्नागिरी : जिल्ह््यात आत्तापर्यंत एकूण १५९९०.०४ मिलिमीटर (सरासरी १७७६.६७) पाऊस झाला आहे. गेले चार दिवस पावसाने उसंत घेतली असली, तरी सरीवर पाऊस कोसळत आहे. येथील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ४९ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह््यात किमान सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी तर २१३३.१३ मिलिमीटर इतकाच पाऊस जून ते आॅक्टोबरपर्यंत कोसळला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत चांगले राहिले आहे. शेतीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. जिल्ह््यात ६९ हजार ४७९ हेक्टरवर भात लागवड करण्यात येते. आत्तापर्यंत ४८ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येत असून, आत्तापर्यंत केवळ १०२० हेक्टर क्षेत्रावरच नागलीची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. भातशेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर नागली लागवड करण्यात येते. त्यामुळे येत्या आठवडाभरात नागली लागवडीची बहुतांश कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरी लागवड एकूण २९.३५ हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाली आहे.कडधान्य लागवड १४९६ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. पैकी २३.१६ हेक्टर क्षेत्रावर ती करण्यात आली आहे. तसेच ११०१.२ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यात ५६९४.८ हेक्टर क्षेत्रावर भात, ५३६ हेक्टरवर नागली तर एक हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. लांजा तालुक्यात ५२११.२ हेक्टर क्षेत्रावर भात, तर चार हेक्टर क्षेत्रावर नागली, २३.१६ हेक्टरवर इतर कडधान्य, १०१.२ हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात ३३५१.२ हेक्टरवर भात, ६९ हेक्टरवर नागली, १५.३५ हेक्टरवर वरी, १० हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात २७८० हेक्टरवर भात व ६५ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात २६५२ हेक्टरवर भात, १६५ हेक्टरवर नागली तर १३ हेक्टरवर वरी लागवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात ६४०२ हेक्टरवर भात व १७९ हेक्टरवर नागली लागवड करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात ६९८०, राजापूर ६८८०, संगमेश्वर ८१७४.५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पाण्याची उणीव भासणाऱ्या क्षेत्रात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. पाऊस कमी झाल्याने आता पाणथळ जागेतील भात लागवड करण्यात येत आहे. जुलै अखेरपर्यंत जिल्ह््यातील भात लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)