शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

Satara Bus Accident : अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:49 IST

आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोपमृतांच्या नातेवाईकांची चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी : आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण कृषी विद्यापीठाच्या ३0 कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता, या बस दुर्घटनेतील प्रकाश सावंत देसाई एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मात्र , सावंतदेसाई यांचे वेगवेगळे वक्तव्य पाहता अपघातामागे संशयास्पद स्थिती असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केला आहे.

हे अपघातग्रस्त वाहन सावंत देसाई स्वत:च चालवत असावेत असा आरोप करुन या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शासन करावे, अशी लेखी तक्रार मुख्यमंत्री, रायगडचे जिल्हाधिकारी आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी दिली आहे.आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात बस झाडावर आदळल्याच्या खुणा आहेत. कोसळणाऱ्या बसमधून एखादी व्यक्ती बाहेर पडणे कठीण आहे, वेगाने दरीत कोसळणाऱ्या बसमधून क्षणार्धात सावंतदेसाई कसे काय बाहेर पडले, तसेच या ठिकाणी मदतकार्य करणाऱ्या ट्रेकर्सना जिथे दोरखंडाचा व इतर साधनांचा वापर करावा लागला, तिथे सावंतदेसाई कोणताही ओरखडा अंगावर न उठता केवळ हाताच्या सहाय्याने २00 ते २५0 फूट दरीतून वर कसा काय आला, दोन गाड्या सहज पास होतील, एवढा प्रशस्त रस्ता असताना बस दरीच्या कडेला कशी काय गेली, असा सवाल गुरव यांनी केला आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी