शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

Satara Bus Accident : अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:49 IST

आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा प्रकाश सावंतदेसार्इंवर आरोपमृतांच्या नातेवाईकांची चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी : आंबेनळी दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रकाश सावंतदेसाई हेच अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांना आज व्यक्त केला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी तसेच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन पाठविण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण कृषी विद्यापीठाच्या ३0 कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता, या बस दुर्घटनेतील प्रकाश सावंत देसाई एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मात्र , सावंतदेसाई यांचे वेगवेगळे वक्तव्य पाहता अपघातामागे संशयास्पद स्थिती असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केला आहे.

हे अपघातग्रस्त वाहन सावंत देसाई स्वत:च चालवत असावेत असा आरोप करुन या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शासन करावे, अशी लेखी तक्रार मुख्यमंत्री, रायगडचे जिल्हाधिकारी आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी दिली आहे.आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात बस झाडावर आदळल्याच्या खुणा आहेत. कोसळणाऱ्या बसमधून एखादी व्यक्ती बाहेर पडणे कठीण आहे, वेगाने दरीत कोसळणाऱ्या बसमधून क्षणार्धात सावंतदेसाई कसे काय बाहेर पडले, तसेच या ठिकाणी मदतकार्य करणाऱ्या ट्रेकर्सना जिथे दोरखंडाचा व इतर साधनांचा वापर करावा लागला, तिथे सावंतदेसाई कोणताही ओरखडा अंगावर न उठता केवळ हाताच्या सहाय्याने २00 ते २५0 फूट दरीतून वर कसा काय आला, दोन गाड्या सहज पास होतील, एवढा प्रशस्त रस्ता असताना बस दरीच्या कडेला कशी काय गेली, असा सवाल गुरव यांनी केला आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी