शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे संत रोहिदास महाराज जयंतीदिनी कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:10 IST

संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे.

राजापूर : संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. संत रोहिदास महाराजांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही तर आई - वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी शिकवणही दिली. संत रोहिदास हे त्याकाळातील आधुनिक संत होते, असे मत प्रमुख वक्ते दिलीप गोखले यांनी व्यक्त केले.

राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे राजापूर नगरवाचनालयाच्या सभागृहात संत रोहिदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गोखले बोलत होते. संत रोहिदास यांचे जीवन व कार्य यावर बोलताना त्यांनी आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, संतांनी दिलेल्या शिकवणीचे आपण सर्वांनी आचरण केले असते, तर समाजात ही जातीभेदाची दरी निर्माणच झाली नसती. या समाजाने अनंत काळापासून पायाची काळजी घेऊन सर्वांचे आरोग्य समृद्ध ठेवण्याचे काम केले आहे. या समाजाचे सर्वांवरच ऋण आहेत, असे त्यांनी सांगितले.

दीपक मेढेकर यांनी तालुक्यात लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्ष होताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे सांगितले. तसेच मे महिन्यात संघटना रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर संघाचे तालुकाध्यक्ष दीपक मेढेकर यांच्यासह संदीप मोरवसकर, दीपक धामापूरकर, रमाकांत मेढेकर, प्रकाश गजापकर, चंद्रकांत देवरूखकर, रघुनाथ आडिवरेकर, अरूण आडिवरेकर, पांडुरंग चव्हाण, दीपक डोंगरकर, चंद्रकांत पवार, संदीप परटवलकर उपस्थित होते. त्याचबरोबर भास्कर धामापूरकर, अनंत मोरवसकर, संतोष कदम, अनंत देवरूखकर, भागिर्थी मेढेकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर चव्हाण यांनी तर आभार दीपक धामापूरकर यांनी मानले.

निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान-

निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे : निबंध स्पर्धा : पहिली ते पाचवी - प्रांजल संदीप मोरवसकर, स्नेहल संदीप परटवलकर, प्राची दीपक धामापूकर, सहावी ते आठवी - मधुरा संदीप मोरवसकर,गायत्री अनिल चव्हाण, तनिष्का विजय चव्हाण, नववी ते बारावी - उदय महादेव धामापूरकर, अक्षय जयवंत नारकर व संतोषी केशव गोवळकर, मानसी अनिल चव्हाण. वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते पाचवी - तन्मय अरूण आडिवरेकर, सोहम प्रशांत आडिवरेकर, प्राची दीपक धामापूरकर, सहावी ते आठवी - सानिया महेंद्र धामापूरकर यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी