शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे संत रोहिदास महाराज जयंतीदिनी कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:10 IST

संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे.

राजापूर : संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. संत रोहिदास महाराजांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही तर आई - वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी शिकवणही दिली. संत रोहिदास हे त्याकाळातील आधुनिक संत होते, असे मत प्रमुख वक्ते दिलीप गोखले यांनी व्यक्त केले.

राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे राजापूर नगरवाचनालयाच्या सभागृहात संत रोहिदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गोखले बोलत होते. संत रोहिदास यांचे जीवन व कार्य यावर बोलताना त्यांनी आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, संतांनी दिलेल्या शिकवणीचे आपण सर्वांनी आचरण केले असते, तर समाजात ही जातीभेदाची दरी निर्माणच झाली नसती. या समाजाने अनंत काळापासून पायाची काळजी घेऊन सर्वांचे आरोग्य समृद्ध ठेवण्याचे काम केले आहे. या समाजाचे सर्वांवरच ऋण आहेत, असे त्यांनी सांगितले.

दीपक मेढेकर यांनी तालुक्यात लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्ष होताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे सांगितले. तसेच मे महिन्यात संघटना रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर संघाचे तालुकाध्यक्ष दीपक मेढेकर यांच्यासह संदीप मोरवसकर, दीपक धामापूरकर, रमाकांत मेढेकर, प्रकाश गजापकर, चंद्रकांत देवरूखकर, रघुनाथ आडिवरेकर, अरूण आडिवरेकर, पांडुरंग चव्हाण, दीपक डोंगरकर, चंद्रकांत पवार, संदीप परटवलकर उपस्थित होते. त्याचबरोबर भास्कर धामापूरकर, अनंत मोरवसकर, संतोष कदम, अनंत देवरूखकर, भागिर्थी मेढेकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर चव्हाण यांनी तर आभार दीपक धामापूरकर यांनी मानले.

निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान-

निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे : निबंध स्पर्धा : पहिली ते पाचवी - प्रांजल संदीप मोरवसकर, स्नेहल संदीप परटवलकर, प्राची दीपक धामापूकर, सहावी ते आठवी - मधुरा संदीप मोरवसकर,गायत्री अनिल चव्हाण, तनिष्का विजय चव्हाण, नववी ते बारावी - उदय महादेव धामापूरकर, अक्षय जयवंत नारकर व संतोषी केशव गोवळकर, मानसी अनिल चव्हाण. वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते पाचवी - तन्मय अरूण आडिवरेकर, सोहम प्रशांत आडिवरेकर, प्राची दीपक धामापूरकर, सहावी ते आठवी - सानिया महेंद्र धामापूरकर यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी