शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:59 IST

कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला

रत्नागिरी : कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेसाठी डॉ. सागर रत्नागिरीत आले आहेत. डॉ. सागर हे मूळचे गुजरातमधील असून, काशीमध्ये १९६५ ते ७१ या कालावधीत शिक्षण घेतले. १९७४ मध्ये एम्. ए. करत असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये संस्कृत बातम्या देण्यासाठी भरती सुरू होती. अनुवाद, स्वरचाचणी व मुलाखतीद्वारे १००जणांमधून त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते संस्कृत प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संस्कृत ही समृद्ध भाषा असून, २ हजार धातू, २२ उपसर्ग व २०० प्रत्यय असणारी ही भाषा आधुनिक काळातही तितकीच महत्त्वाची आहे. गणित आणि विज्ञान असणारी ही एक परिपूर्ण भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एका संप्रदायाची ती भाषा असल्याचे सांगून त्याच्यावर मर्यादा आणल्याचे त्यांनी सांगितले. पण संस्कृत ही कोणत्या संप्रदायाची, वर्गाची, जातीची, प्रांताची भाषा नसल्याचे ते म्हणाले.सातव्या शतकामध्ये भगवान शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य व वल्लभाचार्यांनी संस्कृतमधूनच उपनिषद, ब्रह्मसूत्र, टिका, भाष्य, स्तोत्र, रचना लिहिल्या. त्या काळात संपूर्ण भारतात केवळ संस्कृत भाषेचाच उपयोग केला जात होता. त्या-त्या प्रांतात प्रादेशिक भाषा असल्या तरी भारताच्या कोणत्याही भागातला माणूस संस्कृतमध्ये एकमेकांशी संवाद साधत होता. काळानुसार संस्कृत भाषा थोडी मागे पडली असली तरी आता अनेकजण संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत, ती शिकत आहेत. त्यामुळे ही भाषा कधीही लोप पावणार नाही. वैदिक संस्कृत व आधुनिक संस्कृत असे भाषेचे स्वरूप बदलत आहे, असे डॉ. सागर म्हणाले.टिळकांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा योगगोवा आणि नागपूरला जाण्याचा योग आला होता. कोकणात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. केसरी सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या या भूमीमध्ये येण्याचा योग आल्याने आनंद वाटला. केसरीच्या मुखपृष्ठावर संस्कृत श्लोक लिहून समाजात चेतना निर्माण करणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीला वंदन करण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय