शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:59 IST

कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला

रत्नागिरी : कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेसाठी डॉ. सागर रत्नागिरीत आले आहेत. डॉ. सागर हे मूळचे गुजरातमधील असून, काशीमध्ये १९६५ ते ७१ या कालावधीत शिक्षण घेतले. १९७४ मध्ये एम्. ए. करत असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये संस्कृत बातम्या देण्यासाठी भरती सुरू होती. अनुवाद, स्वरचाचणी व मुलाखतीद्वारे १००जणांमधून त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते संस्कृत प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संस्कृत ही समृद्ध भाषा असून, २ हजार धातू, २२ उपसर्ग व २०० प्रत्यय असणारी ही भाषा आधुनिक काळातही तितकीच महत्त्वाची आहे. गणित आणि विज्ञान असणारी ही एक परिपूर्ण भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एका संप्रदायाची ती भाषा असल्याचे सांगून त्याच्यावर मर्यादा आणल्याचे त्यांनी सांगितले. पण संस्कृत ही कोणत्या संप्रदायाची, वर्गाची, जातीची, प्रांताची भाषा नसल्याचे ते म्हणाले.सातव्या शतकामध्ये भगवान शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य व वल्लभाचार्यांनी संस्कृतमधूनच उपनिषद, ब्रह्मसूत्र, टिका, भाष्य, स्तोत्र, रचना लिहिल्या. त्या काळात संपूर्ण भारतात केवळ संस्कृत भाषेचाच उपयोग केला जात होता. त्या-त्या प्रांतात प्रादेशिक भाषा असल्या तरी भारताच्या कोणत्याही भागातला माणूस संस्कृतमध्ये एकमेकांशी संवाद साधत होता. काळानुसार संस्कृत भाषा थोडी मागे पडली असली तरी आता अनेकजण संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत, ती शिकत आहेत. त्यामुळे ही भाषा कधीही लोप पावणार नाही. वैदिक संस्कृत व आधुनिक संस्कृत असे भाषेचे स्वरूप बदलत आहे, असे डॉ. सागर म्हणाले.टिळकांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा योगगोवा आणि नागपूरला जाण्याचा योग आला होता. कोकणात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. केसरी सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या या भूमीमध्ये येण्याचा योग आल्याने आनंद वाटला. केसरीच्या मुखपृष्ठावर संस्कृत श्लोक लिहून समाजात चेतना निर्माण करणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीला वंदन करण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय