शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:59 IST

कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला

रत्नागिरी : कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेसाठी डॉ. सागर रत्नागिरीत आले आहेत. डॉ. सागर हे मूळचे गुजरातमधील असून, काशीमध्ये १९६५ ते ७१ या कालावधीत शिक्षण घेतले. १९७४ मध्ये एम्. ए. करत असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये संस्कृत बातम्या देण्यासाठी भरती सुरू होती. अनुवाद, स्वरचाचणी व मुलाखतीद्वारे १००जणांमधून त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते संस्कृत प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संस्कृत ही समृद्ध भाषा असून, २ हजार धातू, २२ उपसर्ग व २०० प्रत्यय असणारी ही भाषा आधुनिक काळातही तितकीच महत्त्वाची आहे. गणित आणि विज्ञान असणारी ही एक परिपूर्ण भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एका संप्रदायाची ती भाषा असल्याचे सांगून त्याच्यावर मर्यादा आणल्याचे त्यांनी सांगितले. पण संस्कृत ही कोणत्या संप्रदायाची, वर्गाची, जातीची, प्रांताची भाषा नसल्याचे ते म्हणाले.सातव्या शतकामध्ये भगवान शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य व वल्लभाचार्यांनी संस्कृतमधूनच उपनिषद, ब्रह्मसूत्र, टिका, भाष्य, स्तोत्र, रचना लिहिल्या. त्या काळात संपूर्ण भारतात केवळ संस्कृत भाषेचाच उपयोग केला जात होता. त्या-त्या प्रांतात प्रादेशिक भाषा असल्या तरी भारताच्या कोणत्याही भागातला माणूस संस्कृतमध्ये एकमेकांशी संवाद साधत होता. काळानुसार संस्कृत भाषा थोडी मागे पडली असली तरी आता अनेकजण संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत, ती शिकत आहेत. त्यामुळे ही भाषा कधीही लोप पावणार नाही. वैदिक संस्कृत व आधुनिक संस्कृत असे भाषेचे स्वरूप बदलत आहे, असे डॉ. सागर म्हणाले.टिळकांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा योगगोवा आणि नागपूरला जाण्याचा योग आला होता. कोकणात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. केसरी सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या या भूमीमध्ये येण्याचा योग आल्याने आनंद वाटला. केसरीच्या मुखपृष्ठावर संस्कृत श्लोक लिहून समाजात चेतना निर्माण करणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीला वंदन करण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय