शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:59 IST

कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंपूर्ण देशाला जोडणारी संस्कृत ही परिपूर्ण भाषा : डॉ. बलदेवानंद सागरगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला

रत्नागिरी : कोणतीही भाषा व्यवहारात असते तेव्हा ती लुप्त होण्याची भीती नसते. संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी तिच्या व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. संस्कृत भाषेला देव भाषा किंवा अमर भाषा म्हटले जाते त्यामुळे ती लुप्त होणार नाही. अनेक भाषांची जननी असणारी ही भाषा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी परिपूर्ण भाषा असल्याचे मत डॉ. बलदेवानंद सागर यांनी व्यक्त केले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेसाठी डॉ. सागर रत्नागिरीत आले आहेत. डॉ. सागर हे मूळचे गुजरातमधील असून, काशीमध्ये १९६५ ते ७१ या कालावधीत शिक्षण घेतले. १९७४ मध्ये एम्. ए. करत असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये संस्कृत बातम्या देण्यासाठी भरती सुरू होती. अनुवाद, स्वरचाचणी व मुलाखतीद्वारे १००जणांमधून त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते संस्कृत प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संस्कृत ही समृद्ध भाषा असून, २ हजार धातू, २२ उपसर्ग व २०० प्रत्यय असणारी ही भाषा आधुनिक काळातही तितकीच महत्त्वाची आहे. गणित आणि विज्ञान असणारी ही एक परिपूर्ण भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एका संप्रदायाची ती भाषा असल्याचे सांगून त्याच्यावर मर्यादा आणल्याचे त्यांनी सांगितले. पण संस्कृत ही कोणत्या संप्रदायाची, वर्गाची, जातीची, प्रांताची भाषा नसल्याचे ते म्हणाले.सातव्या शतकामध्ये भगवान शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य व वल्लभाचार्यांनी संस्कृतमधूनच उपनिषद, ब्रह्मसूत्र, टिका, भाष्य, स्तोत्र, रचना लिहिल्या. त्या काळात संपूर्ण भारतात केवळ संस्कृत भाषेचाच उपयोग केला जात होता. त्या-त्या प्रांतात प्रादेशिक भाषा असल्या तरी भारताच्या कोणत्याही भागातला माणूस संस्कृतमध्ये एकमेकांशी संवाद साधत होता. काळानुसार संस्कृत भाषा थोडी मागे पडली असली तरी आता अनेकजण संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत, ती शिकत आहेत. त्यामुळे ही भाषा कधीही लोप पावणार नाही. वैदिक संस्कृत व आधुनिक संस्कृत असे भाषेचे स्वरूप बदलत आहे, असे डॉ. सागर म्हणाले.टिळकांच्या जन्मभूमीमध्ये येण्याचा योगगोवा आणि नागपूरला जाण्याचा योग आला होता. कोकणात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. केसरी सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या या भूमीमध्ये येण्याचा योग आल्याने आनंद वाटला. केसरीच्या मुखपृष्ठावर संस्कृत श्लोक लिहून समाजात चेतना निर्माण करणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीला वंदन करण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय