शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सापडली ‘संजीवनी’, प्रा. अश्विनी पाटील यांच्या संशोधनास भारत सरकारकडून मिळाले पेटंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:59 IST

मधुमेह आजारावरील औषधासाठी त्या गेले ३ वर्षे संशोधन करत होत्या

चिपळूण : तालुक्यातील सावर्डेतील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात केमिस्ट्री विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. अश्विनी पाटील यांना ‘बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन ॲंड मेटफॉर्मिन युसिंग नॅचरल पॉलिमर्स’ या संशोधनकार्यास भारत सरकारकडून पेटंट देण्यात आले आहे. हे औषध मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक संजीवनी ठरू शकते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी दिली.हे संशोधन औषधनिर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. या संशोधन कार्यात लोसारटॅन नावाच्या ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचे इमिडीएट रिलीज तसेच मेटफॉर्मिन नावाच्या ब्लड शुगर कंट्रोल करणाऱ्या औषधाचे सस्टेन रिलीज लेयर असणारी एक बायलेअर टॅबलेट बनवण्यात आली आहे. तिच्या ड्रग रिलीजचा अभ्यास करण्यात आला.सिन्थेटिक पोलिमरपेक्षा नैसर्गिक पॉलिमर्सचा औषधांच्या रिलीज प्रोफाइलवर कशा पद्धतीने चांगला परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले. तसेच नैसर्गिक पॉलिमरच्या वाढत्या कॉन्सन्ट्रेशनचा औषधाच्या रिलीजवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आला आहे. जो मेटफार्मिनसारख्या कमी ॲबसॉपशन विंडो असणाऱ्या औषधांच्या सस्टेन रिलीजसाठी खूप महत्त्वाचा आहे. या संशोधन कार्यात प्रा. अश्विनी पाटील यांच्यासोबत प्रा. मदन पोमाजे, अखिल काणेकर व श्वेता शिरोडकर यांचाही सहभाग होता. या संशोधनाबद्दल सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी विशेष कौतुक केले आहे.

अश्विनी पाटील मूळच्या कोल्हापूरच्या

प्रा. पाटील या मूळच्या कोल्हापुरातील कुरुंदवाड येथील रहिवाशी आहेत. त्या सावर्डे ता. चिपळूण येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात गेले १५ वर्षे कार्यरत आहेत. मधुमेह आजारावरील औषधासाठी त्या गेले ३ वर्षे संशोधन करत होत्या. अखेर त्यांच्या या संशोधनाला यश मिळाले असून भारत सरकारने आता त्यांना पेटंटही दिले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीResearchसंशोधनdiabetesमधुमेहChiplunचिपळुण