शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:16 IST

श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.

ठळक मुद्देनळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनीइतरांसमोर एक वेगळा आदर्श

देवरुख : श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.तालुक्यातील मानसकोंड हे गाव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. गावात यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. मात्र, देवरुख येथील मातृमंदिर संस्थेचे तत्कालिन कार्याध्यक्ष कै. भाऊ नारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच या वाडीतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला आहे. विजय नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसमिती फेपडेवाडीने लोकसहभाग आणि देणगीदारांच्या सहकार्यातून २५ जानेवारी २००९ रोजी वाडीतील ८० कुटुंबांना नळपाणी योजना कार्यान्वित केली.गावाची एकी असेल तर कोणतेही काम सहज करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही फेपडेवाडी होय. या वाडीने एकत्र येत महिलांना करावी लागणारी पाण्यासाठीची पायपीट थांबविली आहे. यामध्ये स्थानिकांसह मुंबईस्थित ग्रामस्थांबरोबरच तरुणांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. इतर शासकीय योजनांपेक्षा या वाडीने श्रमदानातून केलेली ही योजना दहा वर्षे अखंडितपणे सुरु आहे. या योजनेच्या देखभालीचे काम स्थानिक ग्रामस्थच करीत असतात.दहा वर्षे झाल्यामुळेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि दि. १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा श्रमदानातून हे काम करण्यात आले. अनेक ठिकाणचे जॉईट्स बदलण्यात आले आहेत. प्रारंभी असलेला उत्साह आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. योजनानिर्मितीचा उत्साह, जोश जसा होता तसाच आजही दुरुस्तीकामी श्रमदानातून दिसून येतो आहे. गावाच्या विकासासाठी नियोजनबध्द केलेले श्रमदान गावच्या विकासास हातभार लावणारे ठरत आहे.पाणीटंचाई केली दूरमानसकोंड फेफडेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गणुजी फेपडे तसेच पाणी कमिटी व सर्व वाडीतील स्थानिक मुंबईकर यांचे सतत सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच गेली अकरा वर्षे ८० कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणे सहजशक्य झाले आहे. या वाडीने लोकसहभाग आणि श्रमदानाने या योजनेची दुरूस्ती केली असून इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी