शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:16 IST

श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.

ठळक मुद्देनळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनीइतरांसमोर एक वेगळा आदर्श

देवरुख : श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.तालुक्यातील मानसकोंड हे गाव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. गावात यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. मात्र, देवरुख येथील मातृमंदिर संस्थेचे तत्कालिन कार्याध्यक्ष कै. भाऊ नारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच या वाडीतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला आहे. विजय नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसमिती फेपडेवाडीने लोकसहभाग आणि देणगीदारांच्या सहकार्यातून २५ जानेवारी २००९ रोजी वाडीतील ८० कुटुंबांना नळपाणी योजना कार्यान्वित केली.गावाची एकी असेल तर कोणतेही काम सहज करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही फेपडेवाडी होय. या वाडीने एकत्र येत महिलांना करावी लागणारी पाण्यासाठीची पायपीट थांबविली आहे. यामध्ये स्थानिकांसह मुंबईस्थित ग्रामस्थांबरोबरच तरुणांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. इतर शासकीय योजनांपेक्षा या वाडीने श्रमदानातून केलेली ही योजना दहा वर्षे अखंडितपणे सुरु आहे. या योजनेच्या देखभालीचे काम स्थानिक ग्रामस्थच करीत असतात.दहा वर्षे झाल्यामुळेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि दि. १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा श्रमदानातून हे काम करण्यात आले. अनेक ठिकाणचे जॉईट्स बदलण्यात आले आहेत. प्रारंभी असलेला उत्साह आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. योजनानिर्मितीचा उत्साह, जोश जसा होता तसाच आजही दुरुस्तीकामी श्रमदानातून दिसून येतो आहे. गावाच्या विकासासाठी नियोजनबध्द केलेले श्रमदान गावच्या विकासास हातभार लावणारे ठरत आहे.पाणीटंचाई केली दूरमानसकोंड फेफडेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गणुजी फेपडे तसेच पाणी कमिटी व सर्व वाडीतील स्थानिक मुंबईकर यांचे सतत सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच गेली अकरा वर्षे ८० कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणे सहजशक्य झाले आहे. या वाडीने लोकसहभाग आणि श्रमदानाने या योजनेची दुरूस्ती केली असून इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी