शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:16 IST

श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.

ठळक मुद्देनळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनीइतरांसमोर एक वेगळा आदर्श

देवरुख : श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.तालुक्यातील मानसकोंड हे गाव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. गावात यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. मात्र, देवरुख येथील मातृमंदिर संस्थेचे तत्कालिन कार्याध्यक्ष कै. भाऊ नारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच या वाडीतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला आहे. विजय नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसमिती फेपडेवाडीने लोकसहभाग आणि देणगीदारांच्या सहकार्यातून २५ जानेवारी २००९ रोजी वाडीतील ८० कुटुंबांना नळपाणी योजना कार्यान्वित केली.गावाची एकी असेल तर कोणतेही काम सहज करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही फेपडेवाडी होय. या वाडीने एकत्र येत महिलांना करावी लागणारी पाण्यासाठीची पायपीट थांबविली आहे. यामध्ये स्थानिकांसह मुंबईस्थित ग्रामस्थांबरोबरच तरुणांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. इतर शासकीय योजनांपेक्षा या वाडीने श्रमदानातून केलेली ही योजना दहा वर्षे अखंडितपणे सुरु आहे. या योजनेच्या देखभालीचे काम स्थानिक ग्रामस्थच करीत असतात.दहा वर्षे झाल्यामुळेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि दि. १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा श्रमदानातून हे काम करण्यात आले. अनेक ठिकाणचे जॉईट्स बदलण्यात आले आहेत. प्रारंभी असलेला उत्साह आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. योजनानिर्मितीचा उत्साह, जोश जसा होता तसाच आजही दुरुस्तीकामी श्रमदानातून दिसून येतो आहे. गावाच्या विकासासाठी नियोजनबध्द केलेले श्रमदान गावच्या विकासास हातभार लावणारे ठरत आहे.पाणीटंचाई केली दूरमानसकोंड फेफडेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गणुजी फेपडे तसेच पाणी कमिटी व सर्व वाडीतील स्थानिक मुंबईकर यांचे सतत सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच गेली अकरा वर्षे ८० कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणे सहजशक्य झाले आहे. या वाडीने लोकसहभाग आणि श्रमदानाने या योजनेची दुरूस्ती केली असून इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी