शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

रत्नागिरीत पाेलिस बंदाेबस्तात पेट्राेलची विक्री

By शोभना कांबळे | Updated: January 2, 2024 11:24 IST

रत्नागिरी : वाहन अपघात झाल्यास शहानिशा न करता त्या चालकाला दोषी धरून दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या ...

रत्नागिरी : वाहन अपघात झाल्यास शहानिशा न करता त्या चालकाला दोषी धरून दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूर करणारा नवीन कायदा संसदेत येऊ घातला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सर्व वाहन चालकांनी संप पुकारला. या संपात टँकर चालक सहभागी झाल्याने रत्नागिरीत मिरजेहून येणारे टँकर अडकल्याने पेट्राेलची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील पेट्राेल पंपावर वाहनचालकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पेट्राेल पंपावर काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.याबाबत माहिती देताना फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (फामपेडा) चे पदाधिकारी उदय लोध यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर त्या चालकाला जामीनही न देता त्याना दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा करण्यात होणार आहे. हा कायदा संसदेत प्रस्तावित आहे. हा कायदा संमत झाल्यास संबंधित चालकाचा दोष आहे किंवा नाही, हे न पाहता त्याला अजामीनपात्र शिक्षेकरिता पात्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व वाहन चालकांनी सोमवारपासून संपाला सुरुवात केली.रत्नागिरीत मिरज येथील तीन डेपोतून पेट्रोलचा पुरवठा केला जातो. रत्नागिरीत येणाऱ्या गाड्यांसाठी पैसे देण्यात आले आहेत. मात्र, वाहन चालकांच्या संपामुळे या गाड्या मिरज येथील डेपोसमोरच उभ्या आहेत. अद्याप या गाड्या भरलेल्या नसल्याने सोमवारी या गाड्या रत्नागिरीत आलेल्या नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला.संपाची माहिती नागरिकांमध्ये पसरताच इंधनाच्या तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली. मात्र, पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे वाहन चालक प्रत्येक पेट्रोल पंपावर उशिरापर्यंत शोधाशोध करत हाेते. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. तर मंगळवारी सकाळपासूनच शहरातील पेट्राेल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली हाेती. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.पेट्राेल पंपावर काेणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी पाेलिस प्रशासनाने घेतली आहे. पेट्राेल पंपाबाहेर पाेलिस तैनात करण्यात आले असून, पेट्राेल पंपांना पाेलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सकाळपासून पेट्राेलपंपाबाहेर पाेलिसांचा खडा पहारा हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPetrolपेट्रोलPoliceपोलिस