शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

एस. टी.ची बलस्थाने प्रवाहित करा : प्रसाद उकर्डे

By admin | Updated: August 1, 2014 23:21 IST

प्रवासी वाढवा अभियान : रत्नागिरी विभागात अभियानाची सुरूवार्त

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसांचा शासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. वर्षभर काम करीत असताना विविध आव्हानाना सामोरे जावे लागते. रस्ता तिथे एस. टी. नेत असताना कमी भारमानातही फेरी सुरू ठेवावी लागते. एस. टी. व्यावसायिकदृष्ट्या फायद्यात किंवा उर्जितावस्थेत आणण्यासाठी बलस्थाने प्रवाहीत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रवासी वाढवा’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रांताधिकारी उकार्डे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव, विभाग नियंत्रक के. बी. देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी बी. के.कुरतडकर, लेखाधिकारी संदीप हर्णे, आगार व्यवस्थापक एस. एम. सिनकर आदी उपस्थित होते.सुरक्षित, वक्तशीर व किफायतशीर प्रवास करणे गरजेचे आहे. चालकाने चालकाची तर वाहकाने पालकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. तसेच सौजन्य, स्वच्छता व व्यावसायिकता यामध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.कुरतडकर यांनी करून अभियानाचा उद्देश विषद केला. वाहक, चालकांनी प्रवाशांशी विनम्रपणे वागण्याची आवश्यक असून, प्रत्येक थांब्यावरील प्रवाशाला बसमध्ये घेण्याची सूचना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी विभागीय संघटनेचे खजिनदार संदीप भोंगले यांनी केली. प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय, सामान्य दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. कोणतेही क्षेत्र समाजाचे प्रतिबिंब असते. सार्वजनिक उपक्रम राबविताना प्रामाणिक व व्यावसायिक पध्दतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या एस.टीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने सजग राहणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या.सध्या एसटीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने त्यानाही या स्पर्धेत उतरावे लागेल असे आवाहन यावेळी करण्यात आले. देशमुख यांनी वाहक चालकांनी विश्वासार्हता वाढवितानाच सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने कामावरील निष्ठा ठेवून स्वयंस्फूर्तीने अभियान राबविले तर ते नक्की कायम टिकेल, असे सांगितले.सूत्रसंचलन राजलक्ष्मी सुर्वे यांनी तर आभारप्रदर्शन आगारव्यवस्थापक एस.एम.सिनकर यांनी केले. (प्रतिनिधी)