शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

एस. टी.ची बलस्थाने प्रवाहित करा : प्रसाद उकर्डे

By admin | Updated: August 1, 2014 23:21 IST

प्रवासी वाढवा अभियान : रत्नागिरी विभागात अभियानाची सुरूवार्त

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसांचा शासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. वर्षभर काम करीत असताना विविध आव्हानाना सामोरे जावे लागते. रस्ता तिथे एस. टी. नेत असताना कमी भारमानातही फेरी सुरू ठेवावी लागते. एस. टी. व्यावसायिकदृष्ट्या फायद्यात किंवा उर्जितावस्थेत आणण्यासाठी बलस्थाने प्रवाहीत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रवासी वाढवा’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रांताधिकारी उकार्डे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव, विभाग नियंत्रक के. बी. देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी बी. के.कुरतडकर, लेखाधिकारी संदीप हर्णे, आगार व्यवस्थापक एस. एम. सिनकर आदी उपस्थित होते.सुरक्षित, वक्तशीर व किफायतशीर प्रवास करणे गरजेचे आहे. चालकाने चालकाची तर वाहकाने पालकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. तसेच सौजन्य, स्वच्छता व व्यावसायिकता यामध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.कुरतडकर यांनी करून अभियानाचा उद्देश विषद केला. वाहक, चालकांनी प्रवाशांशी विनम्रपणे वागण्याची आवश्यक असून, प्रत्येक थांब्यावरील प्रवाशाला बसमध्ये घेण्याची सूचना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी विभागीय संघटनेचे खजिनदार संदीप भोंगले यांनी केली. प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय, सामान्य दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. कोणतेही क्षेत्र समाजाचे प्रतिबिंब असते. सार्वजनिक उपक्रम राबविताना प्रामाणिक व व्यावसायिक पध्दतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या एस.टीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने सजग राहणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्या.सध्या एसटीला स्पर्धक निर्माण झाला असल्याने त्यानाही या स्पर्धेत उतरावे लागेल असे आवाहन यावेळी करण्यात आले. देशमुख यांनी वाहक चालकांनी विश्वासार्हता वाढवितानाच सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने कामावरील निष्ठा ठेवून स्वयंस्फूर्तीने अभियान राबविले तर ते नक्की कायम टिकेल, असे सांगितले.सूत्रसंचलन राजलक्ष्मी सुर्वे यांनी तर आभारप्रदर्शन आगारव्यवस्थापक एस.एम.सिनकर यांनी केले. (प्रतिनिधी)