शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:03 IST

Grampanchyat Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.

ठळक मुद्देअर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळतीन दिवसांच्या सुट्टीनंतर कार्यालये सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी कार्यरत असली तरीही अद्याप स्थानिक पातळीवर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यातच आता भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, २५ डिसेंबर रोजी आलेली नाताळची सुट्टी त्याला जोडून आलेला शनिवार, रविवार यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करता आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने गर्दी उडाली आहे. सुट्टीत ऑनलाईन सेवा देणारी केंद्र सुरू ठेवल्याने इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. सोमवारपासून तहसील कार्यालयात हे अर्ज दाखल झाले आहेत.कागदपत्रांसाठी दमछाकनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तब्बल १६ ते १७ कागदपत्र जमविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच तीन दिवस सुट्टया आल्याने कागदपत्रे गोळा करता आलेली नाहीत. आता कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी