शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सार्वजनिक मालमत्तेचे २३७ कोटी रुपये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

चिपळूण : शहरासह परिसरातील गावांना महापुराचा तडाखा बसल्याने हजारो कुटुंबांची अपरिमित हानी झाली आहे. अनेक गावे आणि वाड्यांचे संपर्क ...

चिपळूण : शहरासह परिसरातील गावांना महापुराचा तडाखा बसल्याने हजारो कुटुंबांची अपरिमित हानी झाली आहे. अनेक गावे आणि वाड्यांचे संपर्क तुटलेले आहेत. त्यामुळे बाधित लोकांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रथम जनसंपर्क ठेवण्यात यावा. पूरग्रस्त नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी पंचनामा करतानाच बाळगावी, अशा सूचना पालकमंत्री अनिल परब यांनी आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तेचे २३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पालकमंत्री परब यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महापुराची कारणे आणि सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री परब म्हणाले की, बाधित लोकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामा करताना कर्मचाऱ्यांनी निकषाची पट्टी फार लावू नये. लोकांना मदतीचा हात मिळेल, याकडे लक्ष द्यावे. पूरग्रस्तांना मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. त्यामुळे बाधित लोकांनाच ही मदत मिळेल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. शहरासह लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. घरे व दुकानांतून निघालेला चिखल आणि खराब झालेल्या वस्तूंचे ढीग रस्त्यावर साचत आहेत. यातून आगामी काळात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचा धोका आहे. त्यातून लेप्टोची साथ वाढू नये, त्यासाठी आतापासूनच खबरदारी बाळगावी.

शिवाजीनगर येथील डम्पिंग ग्राऊंडची जागा पुरत नसेल तर शहरात अथवा परिसरातील एखादी जागा प्रशासनाने त्वरित ताब्यात घ्यावी. तेथे डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

संस्था, कंपन्या, तरुण मंडळे, विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून खासगी डॉक्टर्स पूरग्रस्तांच्या मदतीला पाठवले जात आहेत. त्यांचेही प्रशासनाने नियोजन करून बाधित कुटुंबांना दिलासा द्यावा. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण सार्वजनिक मालमत्तेचे २३७ कोटींचे नुकसान झालेले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी येथे आले आहेत. त्यांच्या निवासासाठी आवश्यकता भासल्यास खासगी हॉटेल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असेही ते म्हणाले.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, सह्याद्री खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तो काढावा लागेल. आमदार शेखर निकम म्हणाले की, पूरग्रस्तांमधील व्यापाऱ्यांचा विम्याचा प्रश्न गंभीर आहे. विमा कंपन्या अनेक जाचक अटी लावत असल्याने पूरग्रस्तांना मदत मिळण्याची शक्यता धूसर आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनीच विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात. आमदार योगेश कदम म्हणाले की, खेड तालुक्यात पूरस्थिती ओसरल्यानंतर जिल्हा परिषद अथवा सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना अजिबात रिपोर्टिंग झालेले नाही. तेथील बाधितांपर्यंत प्रशासन पोहोचलेले नाही. आम्ही आमच्या स्तरावर पूरग्रस्तांना मदत करत आहोत. निसर्ग चक्रीवादळातील अनुभव खूप वाईट आहे. शासनाने पूरग्रस्तांना भरीव मदत देऊन दिलासा द्यावा.

या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कामाचे प्रस्ताव एक दिवसात देण्याची सूचना दिली. तसेच प्रस्ताव न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.