शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुंभार्ली घाटात खचलेल्या रस्त्याची समस्या कायम, घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 14:52 IST

खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वळणावर खोल आणि लांबच्या लांब खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तूर्तास या घाट रस्त्यातील खड्ड्याच्या समस्येमुळे वाहतूकदार हैराण झाले आहेत.

गुहागर -विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १८ कि.मी. लांबीच्या घाटरस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात टाकून नाले बुजवण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत काढण्याची खरी गरज आहे. या गवतामुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

पोफळीपासून सोनपात्राच्या अलीकडील रस्त्याचे जून २०२१ मध्ये डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर हा रस्ता उखडला आणि जागोजागी खड्डे पडले. काही ठिकाणी खडी बाहेर आल्यामुळे या खडीवरून घसरून दुचाकींचे अपघात झाले. सोनपात्रासह घाटातील पाच ते सहा ठिकाणच्या वळणावर रस्ता चक्क वाहून गेला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी अडीच ते तीन फूट रुंदीचे मोठे चर पडले आहे.

पोफळीपासून पुढे ८ कि.मी.चा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. वळणावरील रस्ता वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वळणावर दोन गाड्या समोरासमोर आल्या, तर एक वाहन पुढे गेल्याशिवाय दुसरे वाहन काढता येत नाही. एखाद्या चालकाने बाजू काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाहन उलटण्याचे प्रकार घडत आहेत. सोनपात्रा येथील वळणावर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. येथे मालवाहू वाहने उलटण्याचे प्रकार अनेकदा घडले. या प्रकारामुळे वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागले.

सोनपात्रा येथील वळणावर रात्री गाडी उलटल्यानंतर पहाट झाल्याशिवाय वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पोलिसांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कुंभार्ली घाटात रस्त्याची अवस्था फारच भयंकर झाले आहे. खराब रस्त्यामुळे रोज एक ना एक ट्रक नादुरुस्त होऊन घाट बंद होतो. गेले तीन वर्षे चिपळूण-कराड रस्त्याला आणि गेल्या वर्षभरापासून कुंभार्ली घाटाला कोणी आईबापच नाही. प्रशासकीय व्यवस्थेने इतकी नीच पातळी गाठलीय की, आता शिव्या द्यायच्या लायकीची पण राहिलेली नाहीये. सोमवारी रात्री कुंभार्ली घाटात असाच एक ट्रक खड्ड्यात मेन-लीप तुटल्यामुळे बंद पडला. दोन्ही बाजूला दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. ही परिस्थिती पावसाळ्यात ठीक आहे, पण आता तरी उपाययोजना करायला हवी. - पांडुरंग कदम, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी