शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कुंभार्ली घाटात खचलेल्या रस्त्याची समस्या कायम, घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 14:52 IST

खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वळणावर खोल आणि लांबच्या लांब खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तूर्तास या घाट रस्त्यातील खड्ड्याच्या समस्येमुळे वाहतूकदार हैराण झाले आहेत.

गुहागर -विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १८ कि.मी. लांबीच्या घाटरस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात टाकून नाले बुजवण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत काढण्याची खरी गरज आहे. या गवतामुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

पोफळीपासून सोनपात्राच्या अलीकडील रस्त्याचे जून २०२१ मध्ये डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर हा रस्ता उखडला आणि जागोजागी खड्डे पडले. काही ठिकाणी खडी बाहेर आल्यामुळे या खडीवरून घसरून दुचाकींचे अपघात झाले. सोनपात्रासह घाटातील पाच ते सहा ठिकाणच्या वळणावर रस्ता चक्क वाहून गेला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी अडीच ते तीन फूट रुंदीचे मोठे चर पडले आहे.

पोफळीपासून पुढे ८ कि.मी.चा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. वळणावरील रस्ता वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वळणावर दोन गाड्या समोरासमोर आल्या, तर एक वाहन पुढे गेल्याशिवाय दुसरे वाहन काढता येत नाही. एखाद्या चालकाने बाजू काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाहन उलटण्याचे प्रकार घडत आहेत. सोनपात्रा येथील वळणावर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. येथे मालवाहू वाहने उलटण्याचे प्रकार अनेकदा घडले. या प्रकारामुळे वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागले.

सोनपात्रा येथील वळणावर रात्री गाडी उलटल्यानंतर पहाट झाल्याशिवाय वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पोलिसांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कुंभार्ली घाटात रस्त्याची अवस्था फारच भयंकर झाले आहे. खराब रस्त्यामुळे रोज एक ना एक ट्रक नादुरुस्त होऊन घाट बंद होतो. गेले तीन वर्षे चिपळूण-कराड रस्त्याला आणि गेल्या वर्षभरापासून कुंभार्ली घाटाला कोणी आईबापच नाही. प्रशासकीय व्यवस्थेने इतकी नीच पातळी गाठलीय की, आता शिव्या द्यायच्या लायकीची पण राहिलेली नाहीये. सोमवारी रात्री कुंभार्ली घाटात असाच एक ट्रक खड्ड्यात मेन-लीप तुटल्यामुळे बंद पडला. दोन्ही बाजूला दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. ही परिस्थिती पावसाळ्यात ठीक आहे, पण आता तरी उपाययोजना करायला हवी. - पांडुरंग कदम, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी