शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कुंभार्ली घाटात खचलेल्या रस्त्याची समस्या कायम, घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 14:52 IST

खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वळणावर खोल आणि लांबच्या लांब खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता काही महिन्यातच उखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तूर्तास या घाट रस्त्यातील खड्ड्याच्या समस्येमुळे वाहतूकदार हैराण झाले आहेत.

गुहागर -विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. १८ कि.मी. लांबीच्या घाटरस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी दरडींची माती नाल्यात टाकून नाले बुजवण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत काढण्याची खरी गरज आहे. या गवतामुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

पोफळीपासून सोनपात्राच्या अलीकडील रस्त्याचे जून २०२१ मध्ये डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर हा रस्ता उखडला आणि जागोजागी खड्डे पडले. काही ठिकाणी खडी बाहेर आल्यामुळे या खडीवरून घसरून दुचाकींचे अपघात झाले. सोनपात्रासह घाटातील पाच ते सहा ठिकाणच्या वळणावर रस्ता चक्क वाहून गेला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी अडीच ते तीन फूट रुंदीचे मोठे चर पडले आहे.

पोफळीपासून पुढे ८ कि.मी.चा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. वळणावरील रस्ता वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वळणावर दोन गाड्या समोरासमोर आल्या, तर एक वाहन पुढे गेल्याशिवाय दुसरे वाहन काढता येत नाही. एखाद्या चालकाने बाजू काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाहन उलटण्याचे प्रकार घडत आहेत. सोनपात्रा येथील वळणावर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. येथे मालवाहू वाहने उलटण्याचे प्रकार अनेकदा घडले. या प्रकारामुळे वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागले.

सोनपात्रा येथील वळणावर रात्री गाडी उलटल्यानंतर पहाट झाल्याशिवाय वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पोलिसांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कुंभार्ली घाटात रस्त्याची अवस्था फारच भयंकर झाले आहे. खराब रस्त्यामुळे रोज एक ना एक ट्रक नादुरुस्त होऊन घाट बंद होतो. गेले तीन वर्षे चिपळूण-कराड रस्त्याला आणि गेल्या वर्षभरापासून कुंभार्ली घाटाला कोणी आईबापच नाही. प्रशासकीय व्यवस्थेने इतकी नीच पातळी गाठलीय की, आता शिव्या द्यायच्या लायकीची पण राहिलेली नाहीये. सोमवारी रात्री कुंभार्ली घाटात असाच एक ट्रक खड्ड्यात मेन-लीप तुटल्यामुळे बंद पडला. दोन्ही बाजूला दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. ही परिस्थिती पावसाळ्यात ठीक आहे, पण आता तरी उपाययोजना करायला हवी. - पांडुरंग कदम, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी